नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत. सध्याच्या १२ जलवाहतूक मार्गांचा सुधारणेसह विस्तार केला जाणार असून कोची रेल मेट्रोच्या डीपीआर सादर करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत मेरिटाईम बोर्डाने विद्यमान १२ जलवाहतूक मार्गांच्या सुधारणा आणि विस्तारासोबतच १० नवीन मार्गांवर जलमार्ग सेवांचा प्रस्ताव मंजूर केला आहे


जलमार्ग सेवेसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या निविदा प्रक्रियेत कोची मेट्रो रेल लिमिटेड ही एकमेव संस्था निवडली गेली. त्यांच्या अहवालानुसार, हे नवे मार्ग स्पीडबोट्स, रो-पॅक्स वाहने आणि जलटॅक्सी सेवांद्वारे कार्यान्वित होणार असून, शहरातील वाहतूक गर्दी कमी करण्यास मदत होईल. विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चार स्वतंत्र जलमार्गांनी जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे.हे नवे मार्ग मुंबईतील विविध भागांना जोडतील. वसई ते काल्हेर मार्ग वसई-मीरा भाईंदर-फाउंटन जंक्शन-गायमुख-नागला बंदरमार्गे असेल. कल्याण ते कोलशेत मार्गाने कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाईल. काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्ग काल्हेर-मुलुंड-ऐरोली-वाशीमार्गे असेल, तर वाशी, बेलापूर आणि गेटवे ऑफ इंडियापासून विमानतळापर्यंत स्वतंत्र मार्ग येतील. इतर मार्गांमध्ये गेटवे ऑफ इंडिया ते वाशी, वसई ते मार्वे, बोरीवली ते बांद्रा (बोरीवली-मार्वे-वर्सोवा-बांद्रा) आणि बांद्रा ते नरिमन पॉइंट (बांद्रा-वरळी-नरिमन पॉइंट) समाविष्ट आहेत.

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :