नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत. सध्याच्या १२ जलवाहतूक मार्गांचा सुधारणेसह विस्तार केला जाणार असून कोची रेल मेट्रोच्या डीपीआर सादर करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत मेरिटाईम बोर्डाने विद्यमान १२ जलवाहतूक मार्गांच्या सुधारणा आणि विस्तारासोबतच १० नवीन मार्गांवर जलमार्ग सेवांचा प्रस्ताव मंजूर केला आहे


जलमार्ग सेवेसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या निविदा प्रक्रियेत कोची मेट्रो रेल लिमिटेड ही एकमेव संस्था निवडली गेली. त्यांच्या अहवालानुसार, हे नवे मार्ग स्पीडबोट्स, रो-पॅक्स वाहने आणि जलटॅक्सी सेवांद्वारे कार्यान्वित होणार असून, शहरातील वाहतूक गर्दी कमी करण्यास मदत होईल. विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चार स्वतंत्र जलमार्गांनी जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे.हे नवे मार्ग मुंबईतील विविध भागांना जोडतील. वसई ते काल्हेर मार्ग वसई-मीरा भाईंदर-फाउंटन जंक्शन-गायमुख-नागला बंदरमार्गे असेल. कल्याण ते कोलशेत मार्गाने कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाईल. काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्ग काल्हेर-मुलुंड-ऐरोली-वाशीमार्गे असेल, तर वाशी, बेलापूर आणि गेटवे ऑफ इंडियापासून विमानतळापर्यंत स्वतंत्र मार्ग येतील. इतर मार्गांमध्ये गेटवे ऑफ इंडिया ते वाशी, वसई ते मार्वे, बोरीवली ते बांद्रा (बोरीवली-मार्वे-वर्सोवा-बांद्रा) आणि बांद्रा ते नरिमन पॉइंट (बांद्रा-वरळी-नरिमन पॉइंट) समाविष्ट आहेत.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा

Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना

Devendra Fadnavis : सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा

 केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश मुंबई, : राज्यातील

Shambhuraj Desai : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सकारात्मक; प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत माहिती

- अधिवेशदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार मुंबई : मुंबईतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या

Pratap Sarnaik : अवैध पार्सल वाहतूक केल्यास खासगी बस चालकांचे लायसन्स होणार सस्पेंड

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; एसटी महामंडळाकडून ८ हजार ३०० बसची खरेदी मुंबई : राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक,