आताची मोठी बातमी: भारत व अमेरिका संबंध सु़धारणार? पुन्हा कटुता दुरावून पडद्यामागे हालचाली

प्रतिनिधी: आताची मोठी बातमी पुढे आली आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पुनः पुन्हा सुधारले जाऊ शकतात असा संकेत दस्तूरखुद्द सरकारने दिला आहे. असे झाल्यास भारतीय निर्या तदार व व्यापारी वर्गाला या निमित्ताने दिलासा मिळेल. यावर स्पष्टीकरण देताना भारत-अमेरिका व्यापार चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्र सारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांची (Negotiator) एक टीम सोमवारी उशिरा नवी दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


त्यांनी असेही नमूद केले की अमेरिकेसोबत व्यापार चर्चा राजनैतिक, व्यापार, मुख्य वाटाघाटीकार आणि मंत्रीस्तरीय अशा विविध पातळ्यांवर सुरू आहेत. अनेक व्यापार मुद्द्यांवर चर्चा होत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय मंत्र्यांबद्दल या बैठकीतून अधिक स्पष्टता येईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जि यो गोर यांनी सिनेटला सांगितले.गेल्या महिन्यात ५०% कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंध बिघडले होते व यानंतर काही काळ थांबल्यानंतर व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेचे गोर (Gor) यांनी गेल्या आठवड्यात नमूद केले की व्यापार कराराच्या बाबतीत अमेरिका आणि भारत फार करारापासून खूप दूर नाहीत आणि ते फक्त कराराच्या बारकाव्यांवर वाटाघाटी करत आहेत.


मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल मैत्रीची अनुकुलता दर्शविली असताना तसेच या नव्या वाटाघाटी देवाणघेवाण केल्यानंतर काही दिवसांतच भारत-अमेरिका संबंधांमध्ये काहीशी कटुता संपली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना 'चांगले मित्र' (Good Friend) आणि नवी दिल्लीला एक मौल्यवान भागीदार म्हणून वर्णन केले, तर मोदींनीही या हावभावाचे कौतुक केले आणि म्हटले की भारत आणि अमेरिकेत अत्यंत सकारात्मक आणि भविष्यवादी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असतानाही, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी चीन आणि भारतावर १००% पर्यंत शुल्क लादण्याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नक्की यावर काय काय पुढे घडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना