आताची मोठी बातमी: भारत व अमेरिका संबंध सु़धारणार? पुन्हा कटुता दुरावून पडद्यामागे हालचाली

प्रतिनिधी: आताची मोठी बातमी पुढे आली आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पुनः पुन्हा सुधारले जाऊ शकतात असा संकेत दस्तूरखुद्द सरकारने दिला आहे. असे झाल्यास भारतीय निर्या तदार व व्यापारी वर्गाला या निमित्ताने दिलासा मिळेल. यावर स्पष्टीकरण देताना भारत-अमेरिका व्यापार चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्र सारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांची (Negotiator) एक टीम सोमवारी उशिरा नवी दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


त्यांनी असेही नमूद केले की अमेरिकेसोबत व्यापार चर्चा राजनैतिक, व्यापार, मुख्य वाटाघाटीकार आणि मंत्रीस्तरीय अशा विविध पातळ्यांवर सुरू आहेत. अनेक व्यापार मुद्द्यांवर चर्चा होत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय मंत्र्यांबद्दल या बैठकीतून अधिक स्पष्टता येईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जि यो गोर यांनी सिनेटला सांगितले.गेल्या महिन्यात ५०% कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंध बिघडले होते व यानंतर काही काळ थांबल्यानंतर व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेचे गोर (Gor) यांनी गेल्या आठवड्यात नमूद केले की व्यापार कराराच्या बाबतीत अमेरिका आणि भारत फार करारापासून खूप दूर नाहीत आणि ते फक्त कराराच्या बारकाव्यांवर वाटाघाटी करत आहेत.


मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल मैत्रीची अनुकुलता दर्शविली असताना तसेच या नव्या वाटाघाटी देवाणघेवाण केल्यानंतर काही दिवसांतच भारत-अमेरिका संबंधांमध्ये काहीशी कटुता संपली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना 'चांगले मित्र' (Good Friend) आणि नवी दिल्लीला एक मौल्यवान भागीदार म्हणून वर्णन केले, तर मोदींनीही या हावभावाचे कौतुक केले आणि म्हटले की भारत आणि अमेरिकेत अत्यंत सकारात्मक आणि भविष्यवादी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असतानाही, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी चीन आणि भारतावर १००% पर्यंत शुल्क लादण्याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नक्की यावर काय काय पुढे घडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि

Kangana Ranaut : समाज म्हणून आपण अपयशी, आत्मपरीक्षण करावे लागेल; कंगना राणावत यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी माफी मागणाऱ्या एका

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

Bomb Making Paper In Collage : धक्कादायक! अयोध्येच्या मेडिकल कॉलेजच्या एक्स-रे विभागात सापडला बॉम्ब बनवण्याचा कथित आराखडा; तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार

Tax Devolution To Maharashtra : केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी नवी दिल्ली : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत

Nashik Crime : अखेर 'त्या' शिक्षिकेच्या हत्येचा लागला छडा, प्रेमसंबंध अन्...

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एका शिक्षिकेच्या हत्येने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. अखेर