आताची मोठी बातमी: भारत व अमेरिका संबंध सु़धारणार? पुन्हा कटुता दुरावून पडद्यामागे हालचाली

प्रतिनिधी: आताची मोठी बातमी पुढे आली आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पुनः पुन्हा सुधारले जाऊ शकतात असा संकेत दस्तूरखुद्द सरकारने दिला आहे. असे झाल्यास भारतीय निर्या तदार व व्यापारी वर्गाला या निमित्ताने दिलासा मिळेल. यावर स्पष्टीकरण देताना भारत-अमेरिका व्यापार चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्र सारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांची (Negotiator) एक टीम सोमवारी उशिरा नवी दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


त्यांनी असेही नमूद केले की अमेरिकेसोबत व्यापार चर्चा राजनैतिक, व्यापार, मुख्य वाटाघाटीकार आणि मंत्रीस्तरीय अशा विविध पातळ्यांवर सुरू आहेत. अनेक व्यापार मुद्द्यांवर चर्चा होत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय मंत्र्यांबद्दल या बैठकीतून अधिक स्पष्टता येईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जि यो गोर यांनी सिनेटला सांगितले.गेल्या महिन्यात ५०% कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंध बिघडले होते व यानंतर काही काळ थांबल्यानंतर व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेचे गोर (Gor) यांनी गेल्या आठवड्यात नमूद केले की व्यापार कराराच्या बाबतीत अमेरिका आणि भारत फार करारापासून खूप दूर नाहीत आणि ते फक्त कराराच्या बारकाव्यांवर वाटाघाटी करत आहेत.


मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल मैत्रीची अनुकुलता दर्शविली असताना तसेच या नव्या वाटाघाटी देवाणघेवाण केल्यानंतर काही दिवसांतच भारत-अमेरिका संबंधांमध्ये काहीशी कटुता संपली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना 'चांगले मित्र' (Good Friend) आणि नवी दिल्लीला एक मौल्यवान भागीदार म्हणून वर्णन केले, तर मोदींनीही या हावभावाचे कौतुक केले आणि म्हटले की भारत आणि अमेरिकेत अत्यंत सकारात्मक आणि भविष्यवादी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असतानाही, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी चीन आणि भारतावर १००% पर्यंत शुल्क लादण्याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नक्की यावर काय काय पुढे घडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे, औषध दुकानांसाठी आवारात जागा..

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील औषधे उपलब्ध करून देण्याच्या

मुंबईतील हरित क्षेत्रे, उद्यानांवर आता बुधवारी राणीबागेत होणार चर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच