आताची मोठी बातमी: भारत व अमेरिका संबंध सु़धारणार? पुन्हा कटुता दुरावून पडद्यामागे हालचाली

प्रतिनिधी: आताची मोठी बातमी पुढे आली आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पुनः पुन्हा सुधारले जाऊ शकतात असा संकेत दस्तूरखुद्द सरकारने दिला आहे. असे झाल्यास भारतीय निर्या तदार व व्यापारी वर्गाला या निमित्ताने दिलासा मिळेल. यावर स्पष्टीकरण देताना भारत-अमेरिका व्यापार चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्र सारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.अमेरिकन वाटाघाटीकर्त्यांची (Negotiator) एक टीम सोमवारी उशिरा नवी दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विभागातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


त्यांनी असेही नमूद केले की अमेरिकेसोबत व्यापार चर्चा राजनैतिक, व्यापार, मुख्य वाटाघाटीकार आणि मंत्रीस्तरीय अशा विविध पातळ्यांवर सुरू आहेत. अनेक व्यापार मुद्द्यांवर चर्चा होत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीय मंत्र्यांबद्दल या बैठकीतून अधिक स्पष्टता येईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. भारतासाठी अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जि यो गोर यांनी सिनेटला सांगितले.गेल्या महिन्यात ५०% कर लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंध बिघडले होते व यानंतर काही काळ थांबल्यानंतर व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेचे गोर (Gor) यांनी गेल्या आठवड्यात नमूद केले की व्यापार कराराच्या बाबतीत अमेरिका आणि भारत फार करारापासून खूप दूर नाहीत आणि ते फक्त कराराच्या बारकाव्यांवर वाटाघाटी करत आहेत.


मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल मैत्रीची अनुकुलता दर्शविली असताना तसेच या नव्या वाटाघाटी देवाणघेवाण केल्यानंतर काही दिवसांतच भारत-अमेरिका संबंधांमध्ये काहीशी कटुता संपली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना 'चांगले मित्र' (Good Friend) आणि नवी दिल्लीला एक मौल्यवान भागीदार म्हणून वर्णन केले, तर मोदींनीही या हावभावाचे कौतुक केले आणि म्हटले की भारत आणि अमेरिकेत अत्यंत सकारात्मक आणि भविष्यवादी व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत असतानाही, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी चीन आणि भारतावर १००% पर्यंत शुल्क लादण्याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नक्की यावर काय काय पुढे घडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

अखेर Vantara आरोपमुक्त! न्यायालयातील विजयासह रिलायन्सकडून प्रतिकिया म्हणाले....' भारताच्या...

मोहित सोमण:आज अखेर रिलायन्स फाउंडेशनच्या 'वनतारा' या देशातील सर्वात मोठ्या प्राणी पुनर्वसन प्रकल्पाला (Rehabilitation Centre)

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

अरे बापरे ITR भरताना शेवटच्या दिवशीच वेबसाईट हँग? करदात्यांची तक्रार 'हे' उपाय करुन पहा

प्रतिनिधी:आज आयटीआर भरायचा शेवटचा दिवस आहे.सकाळपासूनच मात्र आयटीआर संकेतस्थळावरील करदात्यांना तांत्रिक