Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय करणार यासाठी यूएई आणि पाकिस्तानच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. मात्र टीम इंडियाचा रस्ता साफ झाला आहे. खरंतर सोमवारी ग्रुप एचे दोन संघ यूएई आणि ओमान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यूएईने ओमानला ४२ धावांनी हरवले. हा ओमानचा सलग दुसरा पराभव होता. यानंतर ते या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. तर टीम इंडियाने सलग दोनही सामने जिंकल्याने त्यांनी क्वालिफाय केले आहे.


टीम इंडियाने यूएईला मोठ्या फरकाने हरवले होते. यानंतर रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानलाही ७ विकेट राखत धूळ चारली होती. यावेळेस आशिया कपमध्ये पहिल्यांदा ८ संघांनी भाग घेतला. ४-४ संघांना दोन दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक ग्रुपमधून २ संघ सुपर ४ साठी क्वालिफाय करतील.


आशिया कप २०२५च्या ग्रुप ए मध्ये ४ संघ हे भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान आहेत. भारताने आतापर्यंत २ सामने खेळलेत आणि दोनही सामन्यांत विजय मिळवला आहे. पाकिस्तान आणि यूएईला प्रत्येकी एक एक विजय मिळाला आहे. तर ओमानला दोन पराभवाचे ध्के बसले.



पाकिस्तानचा श्वास अडकला


१७ सप्टेंबरला पाकिस्तान आणि यूएई यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. यानंतर सुपर ४ मधील दुसरा संघ ठरणार आहे. यूएईने मोठा उलटफेर केला आणि पाकिस्तानला हरवले तर यूएई क्वालिफाय करेल.

Comments
Add Comment

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि