Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय करणार यासाठी यूएई आणि पाकिस्तानच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. मात्र टीम इंडियाचा रस्ता साफ झाला आहे. खरंतर सोमवारी ग्रुप एचे दोन संघ यूएई आणि ओमान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यूएईने ओमानला ४२ धावांनी हरवले. हा ओमानचा सलग दुसरा पराभव होता. यानंतर ते या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. तर टीम इंडियाने सलग दोनही सामने जिंकल्याने त्यांनी क्वालिफाय केले आहे.


टीम इंडियाने यूएईला मोठ्या फरकाने हरवले होते. यानंतर रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानलाही ७ विकेट राखत धूळ चारली होती. यावेळेस आशिया कपमध्ये पहिल्यांदा ८ संघांनी भाग घेतला. ४-४ संघांना दोन दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक ग्रुपमधून २ संघ सुपर ४ साठी क्वालिफाय करतील.


आशिया कप २०२५च्या ग्रुप ए मध्ये ४ संघ हे भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान आहेत. भारताने आतापर्यंत २ सामने खेळलेत आणि दोनही सामन्यांत विजय मिळवला आहे. पाकिस्तान आणि यूएईला प्रत्येकी एक एक विजय मिळाला आहे. तर ओमानला दोन पराभवाचे ध्के बसले.



पाकिस्तानचा श्वास अडकला


१७ सप्टेंबरला पाकिस्तान आणि यूएई यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. यानंतर सुपर ४ मधील दुसरा संघ ठरणार आहे. यूएईने मोठा उलटफेर केला आणि पाकिस्तानला हरवले तर यूएई क्वालिफाय करेल.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना