वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व झोपलेले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सेवाश्रम शाळा कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सालागुडा येथे आहे. येथे शुक्रवारी रात्री विद्यार्थी वसतिगृहात झोपले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे चिकटले. डोळे चिकटवल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी डोळे उघडताच आले नाहीत. त्यानंतर त्यांना आधी गोछापाडा रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर चांगल्या उपचारांसाठी फुलबनी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. एक विद्यार्थ्याची तब्बेत बरी असून इतर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फेविक्विकमुळे डोळ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या घटनेनंतर, जिल्हा प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत फेविक्विक का टाकण्यात आले हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची