जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू


जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात एक कार पडली. या अपघातात कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका तरुणाने नाल्याच्या पाण्यात एक कार बुडलेली पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. यावर पोलिस उपायुक्त दक्षिण राजर्षी राज वर्मा आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कार नाल्यातून बाहेर काढण्यात आली आणि मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. रिंग रोडवर कार अनियंत्रित झाली आणि सोळा फूट खाली असलेल्या अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात पडली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


 


शिवदासपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र कुमार सैनी यांनी सांगितले की, जयपूरच्या फुलियावास केकरी आणि वाटिका येथील रहिवासी काळुराम यांच्या वडिलांच्या निधनानंतर दोन कुटुंबातील सात जण हरिद्वारला गेले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जन करून घरी परतत होते. मृतांमध्ये रामराज वैष्णव, त्यांची पत्नी मधु आणि मुलगा रुद्र आणि नातेवाईक काळुराम, त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा रोहित आणि गजराज यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या