जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू


जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात एक कार पडली. या अपघातात कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका तरुणाने नाल्याच्या पाण्यात एक कार बुडलेली पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. यावर पोलिस उपायुक्त दक्षिण राजर्षी राज वर्मा आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कार नाल्यातून बाहेर काढण्यात आली आणि मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. रिंग रोडवर कार अनियंत्रित झाली आणि सोळा फूट खाली असलेल्या अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात पडली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


 


शिवदासपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र कुमार सैनी यांनी सांगितले की, जयपूरच्या फुलियावास केकरी आणि वाटिका येथील रहिवासी काळुराम यांच्या वडिलांच्या निधनानंतर दोन कुटुंबातील सात जण हरिद्वारला गेले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जन करून घरी परतत होते. मृतांमध्ये रामराज वैष्णव, त्यांची पत्नी मधु आणि मुलगा रुद्र आणि नातेवाईक काळुराम, त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा रोहित आणि गजराज यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली