जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू


जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात एक कार पडली. या अपघातात कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका तरुणाने नाल्याच्या पाण्यात एक कार बुडलेली पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. यावर पोलिस उपायुक्त दक्षिण राजर्षी राज वर्मा आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कार नाल्यातून बाहेर काढण्यात आली आणि मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. रिंग रोडवर कार अनियंत्रित झाली आणि सोळा फूट खाली असलेल्या अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात पडली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


 


शिवदासपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र कुमार सैनी यांनी सांगितले की, जयपूरच्या फुलियावास केकरी आणि वाटिका येथील रहिवासी काळुराम यांच्या वडिलांच्या निधनानंतर दोन कुटुंबातील सात जण हरिद्वारला गेले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जन करून घरी परतत होते. मृतांमध्ये रामराज वैष्णव, त्यांची पत्नी मधु आणि मुलगा रुद्र आणि नातेवाईक काळुराम, त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा रोहित आणि गजराज यांचा समावेश आहे.


Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील