बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू हळू सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी रालोआ (एनडीए) विरोधात मोठी यात्रा काढला. राहुल गांधींना उन्हातान्हात फिरवण्यात आले. पण यात्रा झाल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रीय जनता दलच्या तेजस्वी यादव यांनी त्यांचे मूळ रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.


बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच्या सर्व २४३ जागा लढवणार, असे तेजस्वी यादव यांनी जाहीर केले आहे. यामुळे बिहारमध्ये राजदसोबत यात्रा काढणाऱ्या काँग्रेसची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसला राजदने उल्लू बनवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


मुझफ्फरपूर येथे झालेल्या जाहीर सभेत राजद नेते तेजस्वी यादव यांनी २४३ जागा लढवण्याची घोषणा केली. माझे नाव डोळ्यांपुढे आणा आणि मतदान करा. बिहारला पुढे नेण्यासाठी काम करणार, असेही तेजस्वी यादव म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत मतदार हक्क यात्रा काढल्यानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच्या सर्व २४३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले.


बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. नुकत्याच काढलेल्या यात्रेमुळे पक्षाविषयीची विश्वासार्हता वाढली आहे. यामुळेच सर्व जागा लढवण्याचे नियोजन सुरू असल्याचे तेजस्वी यादव यांनी जाहीर केले.


Comments
Add Comment

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील

छत्तीसगडमधील बेकायदेशीर सामूहिक धर्मांतरास जन्मठेपेची शिक्षा

धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर बळजबरी आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतरासाठी कठोर दंडात्मक तरतुदी रायपूर : छत्तीसगड

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर