Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने मुंबईकर मात्र हैराण झालाय. पुढील तीन तास जोरदार वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


तसेच घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच पडा असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ठाणे, तसेच नवी मुंबईत पावसाने जोर धरला आहे. येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी ठाण्याच्या कल्याण,डोंबिवलीसह काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.


मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी भागात रविवारी मुसळधार पावसाचा, तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस राज्यातील नागरिकांना उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत होता. मुंबईतचही अशीच परिस्थिती होती. दरम्यान, उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली परिसरात शनिवारी सकाळी जोरदार पाऊस पडला.मुंबईतही शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Comments
Add Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी

मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास

मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना