मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के
शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे टार्गेट


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत चालला असून सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ९८.४० टक्के अर्थात १४ लाख २४ हजार १६४ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या १७ दिवसांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाल्यास मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवणे शक्य होणार आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधील पाणीसाठा हा १४ लाख २४ हजार १६४ अर्थात १ लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो. त्या तुलनेत आता या सर्व धरणांमध्ये ९८.४० टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.



१३ सप्टेंबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणीसाठा


सन २०२५ : ९८.४० टक्के
(१४ लाख २४ हजार १६६ दशलक्ष लिटर)


सन २०२४ : ९८.३९ टक्के
(१४ लाख २४ हजार १०७ दशलक्ष लिटर)


सन २०२३ : ९७.०४ टक्के
(१४ लाख०४ हजार ४६५ दशलक्ष लिटर)

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पूजेत विरोधही होणार मवाळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा