मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के
शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे टार्गेट


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत चालला असून सर्व धरणांमध्ये मिळून एकूण ९८.४० टक्के अर्थात १४ लाख २४ हजार १६४ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या १७ दिवसांमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाल्यास मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवणे शक्य होणार आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधील पाणीसाठा हा १४ लाख २४ हजार १६४ अर्थात १ लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४२ हजार ४१६ कोटी लिटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो. त्या तुलनेत आता या सर्व धरणांमध्ये ९८.४० टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.



१३ सप्टेंबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणीसाठा


सन २०२५ : ९८.४० टक्के
(१४ लाख २४ हजार १६६ दशलक्ष लिटर)


सन २०२४ : ९८.३९ टक्के
(१४ लाख २४ हजार १०७ दशलक्ष लिटर)


सन २०२३ : ९७.०४ टक्के
(१४ लाख०४ हजार ४६५ दशलक्ष लिटर)

Comments
Add Comment

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच

gig worker : गिग आणि डिलिव्हरी कामगारांची सक्त पडताळणी

मुंबई : महाराष्ट्रातील स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीटसारख्या असंख्य ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आणि

crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता

anna bhau sathe : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला गती देण्याचे निर्देश

मुंबई : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्किट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून

Mumbai : बोरिवलीतील बीएसएनएल व एमटीएनएलची आरक्षित जागा पीएम आवास योजनेसाठी वापरणार

मुंबई : पीएम आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) आणि महानगर