भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक लठ्ठ आणि जादा वजन असलेल्या मुलांचा देश ठरू शकतो, असा इशारा युनिसेफ इंडियाचे आहार विभागाचे प्रमुख मारी-क्लॉद डेसिले यांनी दिला. यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.


अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण सध्या खाद्यपदार्थांच्या पॅकच्या पुढील भागावरील लेबल (एफओएनएल) तयार करत आहे. या लेबलमुळे साखर, मीठ व चरबी जास्त असलेले पदार्थ ग्राहकांना सहज ओळखता येतील. सर्वोच्च न्यायालयाने आधीच हे नियम अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत.


‘युनिसेफ’च्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतात सुमारे २७ दशलक्ष (२.७ कोटी) मुले आणि किशोरवयीन लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असतील. हे जागतिक एकूण संख्येच्या ११ टक्के इतके आहे. डेसिले यांनी सांगितले की, भारताकडे नेतृत्व करण्याची संधी आहे. वेळेत उपाययोजना झाल्या, तर भारत इतर देशांसाठी आदर्श ठरू शकतो. भारतामध्ये आधीच फिट इंडिया मूव्हमेंट, ईट राईट इंडिया, पोषण अभियान २.० यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, ‘युनिसेफ’च्या मते अजून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. भारतासमोर एकीकडे कुपोषण, तर दुसरीकडे लठ्ठपणा अशा त्रिगुणी पोषण-संकटाची स्थिती आहे. योग्य निर्णय आताच घेतले, तर भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित होऊ शकते.





  • भारतात २०३० पर्यंत २७ दशलक्ष लठ्ठ मुले असण्याचा अंदाज




  • ‘एफएसएसएआय’कडून लवकरच फ्रंट-ऑफ-पॅक लेबलिंग




  • जाहिरातींवर निर्बंध आणि हेल्थ टॅक्सची गरज




  • पोषण अभियानासारख्या योजना सुरू; पण आणखी पावले आवश्यक




आवश्यक उपाययोजना




  • आरोग्यकर अन्न उत्पादनाला प्रोत्साहन




  • अस्वास्थ्यकर अन्नावरील जाहिरातींवर नियंत्रण




  • ‘हेल्थ टॅक्स’ लावण्याचा विचार




  • शालेय पातळीवर पोषण-जागरूकता कार्यक्रम



Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक