सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा


मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपूल वर्षानुवर्षे प्रतीक्षेनंतर जनतेसाठी खुला करण्यात आला. परंतु उद्घाटनानंतर लगेचच उड्डाणपुलावर खड्डे दिसू लागले. ७२ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल उघडल्यानंतर लगेचच त्यावर मोठे खड्डे दिसू लागले. कल्याण शील रस्त्यावरील उड्डाणपुलाचा ५६२ मीटर लांबीचा, दोन पदरी भाग हा नियोजित चार पदरी प्रकल्पाचा एक भाग आहे.


सुमारे सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ७२ कोटी रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम या वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण झाले. शिळफाटा आणि कल्याणमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील रहिवाशांना चांगल्या प्रवास सुविधा देण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. म्हणूनच, हा एक महत्त्वाचा दुवा म्हणून सादर करण्यात आला होता, परंतु या उड्डाणपुलावरील मोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.



खराब डांबरीकरणावर लोकांची नाराजी


उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यात त्रुटी दिसू लागल्या आहेत. त्यानंतर प्रवाशांनी या उड्डाणपुलाला ‘निसरडा भाग’ असे संबोधले. नव्याने उघडलेल्या भागावर सैल खडी, चिखलाचे ठिपके, सिमेंटचे स्प्लेटर्स आणि खराब डांबरीकरणाबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली. या उड्डाणपुलाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उड्डाणपुलावर मोठे खड्डे दिसत आहेत आणि त्यावरून वाहने जात असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून