बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी


मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सेवा पोहोचवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठा धक्का बसला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने महाराष्ट्रातील २,७५१ गावांमध्ये '४जी' सेवा सुरू करण्याची योजना आखली होती, मात्र आता ही संख्या कमी करून केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारले जाणार आहेत.



सरकारचा मोफत जमीन देण्याचा निर्णय


या ९३० गावांमध्ये टॉवर उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बीएसएनएलला मोफत जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने प्रत्येक टॉवरसाठी २०० चौरस मीटर जमीन विनाशुल्क देण्यास मंजुरी दिली असून, जिल्हाधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत प्रकल्पाला मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, वीजपुरवठा आणि फायबर केबल्ससाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.



आधीच्या योजनेला खीळ


एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत तांत्रिक अडचणींमुळे अनेक ठिकाणी काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे, बीएसएनएलने सुधारित यादी तयार करून ९३० गावांची निवड केली, ज्याला आता राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील डिजिटल कनेक्टिव्हिटीला गती मिळेल आणि दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येईल.



कोणत्या जिल्ह्यांमध्ये उभारणार टॉवर?


या योजनेत एकूण ३० जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक टॉवर परभणी (७३), नांदेड (७०), लातूर (६७), यवतमाळ (६३) आणि अमरावती (६१) या जिल्ह्यांमध्ये उभारले जातील. गडचिरोली (४८) आणि पालघर (१४) यांसारख्या आदिवासी भागांचाही या योजनेत समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी