"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तो पुढे सरसावला आहे . यावेळी त्याने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली असून, बोटीतून प्रवास करताना त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


पूरग्रस्त भागात जाताना स्थानिक लोकांनी दाखवलेले आदर आणि प्रेम पाहून सोनू सूद भावूक झाला . त्याने सांगितले की, “आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आणि जिथे जिथे गेलो, तिथे लोकांनी अन्न, चहा किंवा दूध देण्याचा आग्रह केला.” पुढे तो म्हणाला , “देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पुरामुळे नष्ट झाली आहेत. हे पाणी ओसरेल, पण त्यांची गरज वाढेल. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे.”





सोनू सूद याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. “ जो सर्वांना अन्न पुरवतो त्या अन्नदात्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे,” असे तो म्हणाला .


पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यातील सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक गावे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरात आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. सरकारकडून आपत्कालीन अन्न व मदतसामग्रीचे वाटप सुरू आहे.


सोनू सूद यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, अम्मी विर्क आणि सोनम बाजवा यांनीही पूरग्रस्तांना मदत केली आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात