"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तो पुढे सरसावला आहे . यावेळी त्याने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली असून, बोटीतून प्रवास करताना त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


पूरग्रस्त भागात जाताना स्थानिक लोकांनी दाखवलेले आदर आणि प्रेम पाहून सोनू सूद भावूक झाला . त्याने सांगितले की, “आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आणि जिथे जिथे गेलो, तिथे लोकांनी अन्न, चहा किंवा दूध देण्याचा आग्रह केला.” पुढे तो म्हणाला , “देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पुरामुळे नष्ट झाली आहेत. हे पाणी ओसरेल, पण त्यांची गरज वाढेल. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे.”





सोनू सूद याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. “ जो सर्वांना अन्न पुरवतो त्या अन्नदात्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे,” असे तो म्हणाला .


पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यातील सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक गावे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरात आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. सरकारकडून आपत्कालीन अन्न व मदतसामग्रीचे वाटप सुरू आहे.


सोनू सूद यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, अम्मी विर्क आणि सोनम बाजवा यांनीही पूरग्रस्तांना मदत केली आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी