"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तो पुढे सरसावला आहे . यावेळी त्याने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली असून, बोटीतून प्रवास करताना त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


पूरग्रस्त भागात जाताना स्थानिक लोकांनी दाखवलेले आदर आणि प्रेम पाहून सोनू सूद भावूक झाला . त्याने सांगितले की, “आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आणि जिथे जिथे गेलो, तिथे लोकांनी अन्न, चहा किंवा दूध देण्याचा आग्रह केला.” पुढे तो म्हणाला , “देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पुरामुळे नष्ट झाली आहेत. हे पाणी ओसरेल, पण त्यांची गरज वाढेल. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे.”





सोनू सूद याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. “ जो सर्वांना अन्न पुरवतो त्या अन्नदात्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे,” असे तो म्हणाला .


पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यातील सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक गावे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरात आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. सरकारकडून आपत्कालीन अन्न व मदतसामग्रीचे वाटप सुरू आहे.


सोनू सूद यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, अम्मी विर्क आणि सोनम बाजवा यांनीही पूरग्रस्तांना मदत केली आहे.

Comments
Add Comment

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

Garib Rath Express Fire : गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग! 'ज्वाळा' पाहून प्रवाशांना फुटला घाम; अनेकजण जखमी, रेल्वेने दिली 'ही' माहिती

अमृतसर : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आज, शनिवारी, सकाळी अचानक मोठा गोंधळ आणि अफरातफरी माजली. लुधियानाहून

Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने

'अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक', संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार

नाशिक: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या 'तेजस एमके 1 ए' च्या

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.

PM Modi on Naxalites : आता तो दिवस दूर नाही…"नक्षलवाद संपणार, हीच मोदीची गॅरंटी!" पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, 'आनंदाचे दिवे लखलखतील'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माओवादी (Maoism) दहशतवादामुळे झालेल्या नुकसानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, या भागातील