"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तो पुढे सरसावला आहे . यावेळी त्याने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली असून, बोटीतून प्रवास करताना त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


पूरग्रस्त भागात जाताना स्थानिक लोकांनी दाखवलेले आदर आणि प्रेम पाहून सोनू सूद भावूक झाला . त्याने सांगितले की, “आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आणि जिथे जिथे गेलो, तिथे लोकांनी अन्न, चहा किंवा दूध देण्याचा आग्रह केला.” पुढे तो म्हणाला , “देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पुरामुळे नष्ट झाली आहेत. हे पाणी ओसरेल, पण त्यांची गरज वाढेल. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे.”





सोनू सूद याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. “ जो सर्वांना अन्न पुरवतो त्या अन्नदात्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे,” असे तो म्हणाला .


पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यातील सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक गावे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरात आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. सरकारकडून आपत्कालीन अन्न व मदतसामग्रीचे वाटप सुरू आहे.


सोनू सूद यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, अम्मी विर्क आणि सोनम बाजवा यांनीही पूरग्रस्तांना मदत केली आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या