मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी


मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र होते. पण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात राहून राज्यपालांनी मणिपूरमधील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी भरपूर काम केले. या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले आणि मणिपूरमधील परिस्थिती बदलली. यानंतर राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा केला. आयत्यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. वेगाने वारे वाहू लागले. या प्रतिकूल वातावरणातही पंतप्रधान मोदींनी आधी ठरवलेला मणिपूरचा दौरा रद्द केला नाही. मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेणे आणि स्थानिकांशी संवाद साधणे या हेतूने पंत्रधान मोदींनी मणिपूरला भेट देण्याचानिर्णय घेतला.


हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाही हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी रस्त्यावरुन प्रवास करुन सभास्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसातून वेगाने अंतर कापत दीड तास रस्त्याने प्रवास करुन पंतप्रधान मोदी सभास्थळी पोहोचले. रस्त्यावर ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत झाले. मोदी मणिपूरमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून उपस्थितांना नमस्कार केला.


अनेकांनी तिरंगा झळकवत पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. तिरंगा हाती धरुन नागरिकांनी स्वागत केल्यामुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले. त्यांनी या स्वागतासाठी सर्वांचे जाहीर आभार मानले. मणिपूरच्या विकासाकरिता ठामपणे उभा राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. मणिपूरमध्ये सभेनंतर पंतप्रधान मोदींनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी काहींनी पंतप्रधान मोदींना भेटवस्तू दिल्या.


Comments
Add Comment

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार