मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी


मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र होते. पण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात राहून राज्यपालांनी मणिपूरमधील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी भरपूर काम केले. या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले आणि मणिपूरमधील परिस्थिती बदलली. यानंतर राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा केला. आयत्यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. वेगाने वारे वाहू लागले. या प्रतिकूल वातावरणातही पंतप्रधान मोदींनी आधी ठरवलेला मणिपूरचा दौरा रद्द केला नाही. मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेणे आणि स्थानिकांशी संवाद साधणे या हेतूने पंत्रधान मोदींनी मणिपूरला भेट देण्याचानिर्णय घेतला.


हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाही हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी रस्त्यावरुन प्रवास करुन सभास्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसातून वेगाने अंतर कापत दीड तास रस्त्याने प्रवास करुन पंतप्रधान मोदी सभास्थळी पोहोचले. रस्त्यावर ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत झाले. मोदी मणिपूरमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून उपस्थितांना नमस्कार केला.


अनेकांनी तिरंगा झळकवत पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. तिरंगा हाती धरुन नागरिकांनी स्वागत केल्यामुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले. त्यांनी या स्वागतासाठी सर्वांचे जाहीर आभार मानले. मणिपूरच्या विकासाकरिता ठामपणे उभा राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. मणिपूरमध्ये सभेनंतर पंतप्रधान मोदींनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी काहींनी पंतप्रधान मोदींना भेटवस्तू दिल्या.


Comments
Add Comment

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व नवी दिल्ली : बिहार विधानसभा

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.