मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी


मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र होते. पण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात राहून राज्यपालांनी मणिपूरमधील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी भरपूर काम केले. या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले आणि मणिपूरमधील परिस्थिती बदलली. यानंतर राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा केला. आयत्यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. वेगाने वारे वाहू लागले. या प्रतिकूल वातावरणातही पंतप्रधान मोदींनी आधी ठरवलेला मणिपूरचा दौरा रद्द केला नाही. मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेणे आणि स्थानिकांशी संवाद साधणे या हेतूने पंत्रधान मोदींनी मणिपूरला भेट देण्याचानिर्णय घेतला.


हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाही हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी रस्त्यावरुन प्रवास करुन सभास्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसातून वेगाने अंतर कापत दीड तास रस्त्याने प्रवास करुन पंतप्रधान मोदी सभास्थळी पोहोचले. रस्त्यावर ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत झाले. मोदी मणिपूरमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून उपस्थितांना नमस्कार केला.


अनेकांनी तिरंगा झळकवत पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. तिरंगा हाती धरुन नागरिकांनी स्वागत केल्यामुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले. त्यांनी या स्वागतासाठी सर्वांचे जाहीर आभार मानले. मणिपूरच्या विकासाकरिता ठामपणे उभा राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. मणिपूरमध्ये सभेनंतर पंतप्रधान मोदींनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी काहींनी पंतप्रधान मोदींना भेटवस्तू दिल्या.


Comments
Add Comment

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर

अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील

‘मोंथा’ चक्रीवादळाचा इशारा; ५ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

दिल्ली: आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८