राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे



मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम रेल्वेद्वारे जोडण्यात आले. मिझोरममध्ये पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींनी बैरागी ते सैरांग या ५१ किमीपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. या रेल्वे सेवेमुळे रेल्वे थेट मिझोरममध्ये राजधानी आयजोलशी जोडली गेली आहे. सैरांग स्टेशन राजधानी आयजोलपासून केवळ १२ किमीवर आहे. यामुळे मिझोरम भारताशी रेल्वे मार्गाने जोडले गेले आहे.





गुवाहाटी किंवा कोलकातापर्यंत जाण्यासाठी आधी ४ ते ५ तास लागत होते. तेच अंतर आता केवळ दीड तासांत पूर्ण करता येईल. बैरागी ते सैरांग दरम्यानची रेल्वे सेवा ही ५१ किमी. च्या मार्गावर धावणार आहे. सीआरएसने या प्रकल्पासाठी ३० जून २०२५ रोजी मंजुरी दिली होती. या रेल्वेसाठी उभारण्यात आलेला पूल १०४ मीटर उंच आहे. हा पूल कुतुबमीनारपेक्षाही ४२ मीटर अधिक उंचीवर आहे. पुढील १०० वर्ष हा पूल टिकेल असं बांधकाम करण्यात आलं आहे.

मिझोरममधील रेल्वे प्रकल्पासाठी ८,०७० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बैराबी आणि सैरांग या दोन नव्या रेल्वे मार्गांचे उद्घाटन केले. यामुळे मिझोरमची राजधानी पहिल्यांदाच भारतीय रेल्वे जाळ्याशी जोडली गेली आहे. जिथे पूल आहे ते ठिकाणी दुर्गम अशा डोंगराळ भागात आहे. रेल्वे मार्ग प्रकल्पात ४५ बोगदे आहेत. याशिवाय, त्यात ५५ मोठे पूल आणि ८८ लहान पूल देखील आहेत. रेल्वेमुळे मिझोरमची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तसेच सैन्याला आवश्यकता भासल्यास रेल्वे मार्गाने लष्करी साहित्य अथवा सैन्य तुकड्या वेगाने पुढे पाठवण्यास मदत होणार आहे. मिझोरममधील पर्यटनाला चालना मिळण्यासही रेल्वेमुळे मदत होणार आहे. मिझोरम या राज्याच्या सीमा म्यानमार आणि बांगलादेश या दोन देशांशी जोडलेल्या आहेत. यामुळे मिझोरममध्ये रेल्वे सेवा सुरू होण्याला देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे