Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचा ते कधीच आदर करणार नाहीत", नितेश राणे यांची काँग्रेसवर टिका

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वादावर नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबाचे समर्थक म्हटले


मुंबई: कर्नाटक मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्यावरून सुरू झालेल्या वादावर मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी काँग्रेस कुटुंबावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबचे समर्थक असे म्हंटले आहे.

ते म्हणाले, "हे लोक कधीही छत्रपती शिवाजी महाराजांना मानू शकत नाही. ते फक्त त्यांचा अवमान करतील आणि नेहमीच द्वेषाची भावना बाळगत राहतील. काँग्रेसकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? आमच्यासारखे लोकं या मानसिकतेला तीव्र विरोध करतील." शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंटमेरी ठेवण्याच्या वादावरून नितेश राणे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दि. ८ सप्टेंबर रोजी सेंट मेरीज बॅसिलिका येथे सिद्धरामय्या यांनी आश्वासन दिले होते की, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी यांच्या नावावर ठेवले जाईल. शिवाजीनगरचे आमदार रिझवान अर्शद आणि बंगळुरूचे आर्च बिशप पीटर मचाडो यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर म्हणून त्यांनी हे विधान केले.

उद्धव ठाकरेंवर टिका


दुसरीकडे, भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याबाबत उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "सामना आणि उद्धव ठाकरे यांना भारत-पाकिस्तान सामन्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? उद्धव ठाकरे जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या विजयी रॅलीत 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावण्यात आले, हिरवे झेंडे फडकवण्यात आले आणि हिरवा गुलाल उधळण्यात आला. त्यावेळी त्यांना पाकिस्तानबद्दल कोणताही राग नव्हता, पण आता अचानक कसे काय त्यांचे भारतावरील प्रेम उफाळून आले?"

आदित्य ठाकरेना टोला


राणे यांनी आरोप केला की राजकीय फायद्यासाठी राष्ट्रवादाचा मुखवटा घातला जात आहे, परंतु भूतकाळातील कृत्ये आणि विधानेच त्यांचा खरा चेहरा उघड करतात. यादरम्यान त्यांनी आदित्य ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे बुरखा घालून भारत-पाकिस्तान सामना गुपचुप पाहिल, आणि त्यांच्या आवाजामुळे त्यांना ओळखले देखील जाणार नाही.

 
Comments
Add Comment

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाजपच्या वाटेवर! कोकणात उबाठासाठी निर्माण झाली मोठी घळ

रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले

सोलापूरमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी! चार बड्या नेत्यांची दमदार इनकमिंग

सोलापूर: सध्या राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, थोडी जरी शंका असती..

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने