लग्नाच्या मुद्यावरुन लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना सुनावलं


बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय असं कसं चालेल ? या शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना सुनावले. बीड जिल्ह्यातील गेवराईतील शृंगारवाडी येथे ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. लक्ष्मण हाके यांनी मेळाव्यात बोलताना जरांगेंना उद्देशून ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर प्रस्ताव मांडला.


आता तुम्ही मागास झाला आहात आता कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात तर आम्ही आमच्यातील ११ पोरं सुचवतो त्यांचा विवाह आपल्यामध्ये ठरवू. आता जात पात राहिली का ? आता तुम्ही श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय राहिलात का ? त्यामुळे सुरुवात म्हणून ११ विवाह जाहीर करू, या शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर लग्नाचा जाहीर प्रस्ताव मांडला.


लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय असं कसं चालेल ? हा मुद्दा आधी एन.डी पाटील यांनी पण मांडला असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.


Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री