Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार


नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतात तयार केलेले रडार आता ५०० किलोमीटर दूर पर्यंतच्या विमानांचा अचूक वेध घेऊ शकते. हे रडार इतके प्रगत आहे की पाचव्या-सहाव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमानंही च्या नजरेतून सुटत नाही.


सूर्या रडार हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (LRDE) ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे रडार भारतीय हवाई दलासाठी (IAF) डिझाइन केले आहे.


स्वदेशी सूर्या व्हीएचएफ रडारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अमेरिकेचे F 35 आणि चीनचे J 20 स्टेल्थ फायटर एअरक्राफ्ट आणि विंग लूंग सारखे ड्रोन ओळखू शकते. विमान, ड्रोन शत्रूचे क्षेपणास्त्र कोणत्या दिशेला जात आहे हे व्यवस्थित सांगू शकते. याच कारणामुळे व्हीएचएफ रडारला स्टेल्थ हंटर असेही म्हणतात.


भारताचे सूर्या रडार एका मिनिटात दहा वेळा ३६० अंशात गोलाकार फिरते आणि ५०० किलोमीटर दूर पर्यंतच्या संभाव्य हवाई हल्ल्यांचा अचूक वेध घेऊ शकते. हे रडार दोन ६×६ हाय-मोबिलिटी वाहनांवर आधारित आहे, ज्यामुळे ते कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत सहजपणे तैनात करता येते. हे रडार एक मोबाइल युनिट म्हणून काम करते आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांना ओळखण्यासाठी सूर्यामध्येच थ्रीडी रडार तंत्रज्ञान देखील आहे. याच कारणामुळे भारताने विकसित केलेले सूर्या रडार आकाश आणि क्यूआरएसएएम क्षेपणास्त्र प्रणालींसारख्या स्वदेशी हवाई संरक्षण प्रणालींशी जोडल्यास शत्रूसाठी आणखी घातक ठरेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


Comments
Add Comment

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व नवी दिल्ली : बिहार विधानसभा

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.