Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार


नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतात तयार केलेले रडार आता ५०० किलोमीटर दूर पर्यंतच्या विमानांचा अचूक वेध घेऊ शकते. हे रडार इतके प्रगत आहे की पाचव्या-सहाव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमानंही च्या नजरेतून सुटत नाही.


सूर्या रडार हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (LRDE) ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे रडार भारतीय हवाई दलासाठी (IAF) डिझाइन केले आहे.


स्वदेशी सूर्या व्हीएचएफ रडारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अमेरिकेचे F 35 आणि चीनचे J 20 स्टेल्थ फायटर एअरक्राफ्ट आणि विंग लूंग सारखे ड्रोन ओळखू शकते. विमान, ड्रोन शत्रूचे क्षेपणास्त्र कोणत्या दिशेला जात आहे हे व्यवस्थित सांगू शकते. याच कारणामुळे व्हीएचएफ रडारला स्टेल्थ हंटर असेही म्हणतात.


भारताचे सूर्या रडार एका मिनिटात दहा वेळा ३६० अंशात गोलाकार फिरते आणि ५०० किलोमीटर दूर पर्यंतच्या संभाव्य हवाई हल्ल्यांचा अचूक वेध घेऊ शकते. हे रडार दोन ६×६ हाय-मोबिलिटी वाहनांवर आधारित आहे, ज्यामुळे ते कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत सहजपणे तैनात करता येते. हे रडार एक मोबाइल युनिट म्हणून काम करते आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांना ओळखण्यासाठी सूर्यामध्येच थ्रीडी रडार तंत्रज्ञान देखील आहे. याच कारणामुळे भारताने विकसित केलेले सूर्या रडार आकाश आणि क्यूआरएसएएम क्षेपणास्त्र प्रणालींसारख्या स्वदेशी हवाई संरक्षण प्रणालींशी जोडल्यास शत्रूसाठी आणखी घातक ठरेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव