मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी


नाशिक : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे आहे तर ते का पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली आहे.


मागील काही दिवसापासून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुरू आहे. या सर्व प्रश्नावरती ओबीसी आरक्षणावरून भरत कराड या लातूर जिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या परिवाराला भेटण्यासाठी जाण्याआधी भुजबळ नाशकात पत्रकारांशी बोलत होते.


ते म्हणाले की, मराठा समाजाला आतापर्यंत आर्थिक मागासवर्ग यातून आरक्षण दिले गेले. तसेच ओबीसी प्रवर्गामध्ये देखील आरक्षण दिले गेलेले आहे. मग पूर्ण आरक्षणाची मागणी का केली जाते, असा प्रश्न उपस्थित करून भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचे जे सुशिक्षित आणि शिकलेले नेते आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर सर्वांना द्यावं कारण त्यांना ओबीसीच प्रवर्ग का पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास का आहे, जे शिकलेले नाही ज्यांना समजत नाही, अशांनी या प्रश्नाचे उत्तर देऊ नये, असे स्पष्ट करून भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नेत्यांकडे या प्रश्नाला खरे उत्तर देण्याची मागणी केली आहे.


पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, आत्तापर्यंत तीन आयोगाने मराठा समाजाचे आरक्षण हे फेटाळलेले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केलेले आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले काही केंद्रात गेले. पण, त्यांनी असं काही केलं नाही असे स्पष्ट करून भुजबळ म्हणाले की गायकवाड क्लासचे प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीने मिळवले जातात हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावापोटी सामाजिक मागासलेपण सिद्ध करता येत नाही. राजकीय दृष्ट्या प्रबळ हात म्हणून मागास वर्गात प्रवेश करू शकत नाही असेही भुजबळ यांनी मत व्यक्त केलेले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

विम्बल्डन: सेरेना विल्यम्सचे पुनरागमन; पहिल्या फेरीत २० वर्षीय माया जॉइंटशी होणार मुकाबला

  लंडन : टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्स विम्बल्डन २०२६ मध्ये पुन्हा एकदा कोर्टवर उतरण्यासाठी

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Secretary Kiran Pawaskar : उद्धव ठाकरेंनी “माफी दौरा” काढावा”

मुलाचे करियर वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंची धावपळ सुरू शिवसेना सचिव किरण पावसकर यांची खरमरीत टीका मुंबई  :

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी