मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी


नाशिक : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे आहे तर ते का पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली आहे.


मागील काही दिवसापासून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुरू आहे. या सर्व प्रश्नावरती ओबीसी आरक्षणावरून भरत कराड या लातूर जिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या परिवाराला भेटण्यासाठी जाण्याआधी भुजबळ नाशकात पत्रकारांशी बोलत होते.


ते म्हणाले की, मराठा समाजाला आतापर्यंत आर्थिक मागासवर्ग यातून आरक्षण दिले गेले. तसेच ओबीसी प्रवर्गामध्ये देखील आरक्षण दिले गेलेले आहे. मग पूर्ण आरक्षणाची मागणी का केली जाते, असा प्रश्न उपस्थित करून भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचे जे सुशिक्षित आणि शिकलेले नेते आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर सर्वांना द्यावं कारण त्यांना ओबीसीच प्रवर्ग का पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास का आहे, जे शिकलेले नाही ज्यांना समजत नाही, अशांनी या प्रश्नाचे उत्तर देऊ नये, असे स्पष्ट करून भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नेत्यांकडे या प्रश्नाला खरे उत्तर देण्याची मागणी केली आहे.


पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, आत्तापर्यंत तीन आयोगाने मराठा समाजाचे आरक्षण हे फेटाळलेले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केलेले आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले काही केंद्रात गेले. पण, त्यांनी असं काही केलं नाही असे स्पष्ट करून भुजबळ म्हणाले की गायकवाड क्लासचे प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीने मिळवले जातात हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावापोटी सामाजिक मागासलेपण सिद्ध करता येत नाही. राजकीय दृष्ट्या प्रबळ हात म्हणून मागास वर्गात प्रवेश करू शकत नाही असेही भुजबळ यांनी मत व्यक्त केलेले आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Iran - America War : इराणला धमकावणे अशक्य, रशियाचा अमेरिकेला इशारा

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची रशियाच्या दौऱ्यावर मॉस्को येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान

Breaking News : “मराठी सक्तीला तात्पुरता ब्रेक?”; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी निर्णय ऑगस्टपर्यंत स्थगित असल्याचा शशांक राव यांचा दावा

- सरकारचा अंतिम निर्णय मात्र प्रतीक्षेत मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Urea : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार

नवी दिल्ली : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार आहेत. यासाठी एक प्रकल्प