अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई २.०७% वर पोहोचली मात्र.....

प्रतिनिधी:भारताच्या किरकोळ महागाईत (Retail Inflation) निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर ऑगस्टला २.०७% वाढ झाली आहे. सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ झाली असली तरी आरबीआयच्या नियंत्रित टार्गेट पातळीच्या आत असल्याने हा अर्थव्यवस्थेचा दृष्टीने गंभीर चिंतेचा विषय नाही. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार २.०७% वर किरकोळ चलनवाढ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ४% च्या मध्यम-मुदतीच्या लक्ष्यापेक्षा आरामात कमी आहे, ज्यामुळे मध्यवर्ती बँकेला धोरणात्मक जागा उपलब्ध आहे. जुलै महिन्यातील तुलनेत ऑगस्ट महिन्यात हेडलाईन महागाईत (Headline Inflation) ४६ बेसिस पूर्णांकाने वाढ झाली असे मंत्रालयाने आपल्या माहितीत म्हटले.अन्नधान्याच्या बाबतीत विचार के ल्यास आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर सीएफपीआय (Consumer Food Price Index CFPI) मध्ये मागील वर्षाच्या ऑगस्टच्या तुलनेत या ऑगस्टला ०.६९% घसरण झाली आहे. प्रोविजनल माहितीनुसार, ही घसरण झाली असून आर्थिक वर्ष २०२४ मधील ऑगस्टला ग्रामीण व शहरी भागात हा दर अनुक्रमे ०.७०%,०.५८% वर घसरला होता.


सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भाज्या, मांस आणि मासे, खाद्यतेल, अंडी आणि वैयक्तिक काळजी (Personal Care ) घेणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाईत ४६ बेसिस पू र्णांकाने वाढ झाली आहे. सरकारने म्हटले आहे की, प्रमुख महागाईत किरकोळ वाढ झाली असली तरी, अन्नधान्याच्या किमती चलनवाढीच्या क्षेत्रातच राहिल्या आहेत. अखिल भारतीय ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CFPI) वर आधारित अन्नधान्याच्या महागाईत ऑगस्ट २०२५ मध्ये वार्षिक ०.६९% ची घट झाली. तथापि, महिन्या-दर-महिना पाहता, अन्नधान्याच्या किमती १०७ बेसिस पॉइंट्सने वाढल्या. यापेक्षा कमी केल्यास, ग्रामीण भागात अन्नधान्याच्या महागाईचा दर -०.७०% राहिला, तर शहरी भागांसाठी संबंधित आ कडा -०.५८% इतका किंचित चांगला होता. मंत्रालयाने असेही नमूद केले आहे की अन्नधान्याच्या किमतीत घट झाली आहे कारण भाज्यांचे भाव वाढले आहेत आणि अंडी आणि मांस यांसारख्या प्रथिनेयुक्त वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण आणि शहरी महागा ईमध्येही फरक दिसून आला आहे. ग्रामीण भागातील किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये १.६९% वर पोहोचली आहे जी जुलैमध्ये १.१८% होती, तर शहरी महागाई त्याच कालावधीत २.१०% होती जी २.४७% वर पोहोचली आहे.


प्रमुख श्रेणींमध्ये, गृहनिर्माण महागाई ऑगस्टमध्ये किंचित कमी होऊन ३.०९% वर आली आहे जी जुलैमध्ये ३.१७% होती. शिक्षण महागाई देखील कमी झाली आहे, जी ४.११% वरून ३.६०% वर आली आहे, तर आरोग्य महागाई ४.५७% वरून ४.४०% वर आली आहे. वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रासाठी महागाई दर जुलैमध्ये २.१२% वरून १.९४% वर आला आहे, तर इंधन आणि हलक्या किमतीचा महागाई जुलै महिन्यात २.६७% वरून २.४३% वर आला आहे.यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये महागाई ६.२१ वर पोहोचली आणि तेव्हापासून दर महिन्याला घसरत आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये चलनवाढ अनुक्रमे २.८२%, २.१% आणि १.५५% नोंदवली गेली. एका सर्वेक्षणात असा अंदाज होता की सीपीआय महागाईचा घसरणारा कल संपुष्टात येऊ शकतो आणि ऑगस्टमध्ये 'बेस इफेक्ट' कमी होत असल्याने आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्याने थोडी वाढ होऊ शकते. जुलैमध्ये ही ८ वर्षांची नीचांकी १.५५% घसरण आहे.

Comments
Add Comment

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य

देशातील क्रमांक दोन आयटी कंपनीचा तिमाही निकाल जाहीर इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २% घसरण

मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,

Devendra Fadnavis : परप्रांतियांना थोबाडीत मारणं म्हणजे मुंबईचा विकास नव्हे; मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर बोचरा वार

वरळीच्या बीडीडी चाळीतून भरला प्रचाराचा हुंकार मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा