Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा; अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण टिकून असून अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३ मंडळात विशेषतः अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक वाढणार असून १३ सप्टेंबर रोजी मराठवाडा प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


१३ व १४ सप्टेंबरला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण असण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.


१३ सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, सांगली, रायगड आणि सातारा घाटमाथ्यावर पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे भागातही पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. पालघर, धुळे, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी व पुणे घाटमाथ्यावर पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण मराठवाड्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट दिला गेलेला नाही. १५ सप्टेंबरसाठीही पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पावसाच्या मुसळधार सरीमुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस

७/११ बॉम्बस्फोटात निर्दोष सुटका झालेल्या व्यक्तीची चुकीच्या कारावासासाठी भरपाईची मागणी

मुंबई: ७/११ च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोटात २०१५ मध्ये निर्दोष सुटका झालेली एकमेव व्यक्ती, अब्दुल वाहिद शेख