मुंबईचा ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून बंद; वाहतुकीचा नवा मार्ग जाहीर


मुंबई : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणाऱ्या एल्फिन्स्टन ब्रिज अर्थात प्रभादेवी पुलावरील वाहतूक आज म्हणजेच शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री बारा वाजल्यापासून पूर्ण बंद होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण हा पूल पाडणार आहे. या ठिकाणी नंतर मुंबई महानगर विकास प्राधिकरण नवा एल्फिन्स्टन उड्डाणपूल तसेच शिवडीवरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल उभारणार आहे. हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभागाने एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी वापरायच्या पर्यायी मार्गाबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी वापरायच्या पर्यायी मार्गाबाबतची माहिती


दादर पूर्व ते पश्चिम टिळक पूल


परळ पूर्व ते प्रभादेवी करीरोड पूल


परळ/भायखळा पूर्व ते प्रभादेवी चिंचपोकळी पूल



स्थानिकांसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय


म्हाडाकडून एल्फिन्स्टन पूल बाधितांना घरे देण्यात येणार आहेत. दोन इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. प्रभादेवी येथील म्हाडा इमारतींमध्ये प्रत्येकी 405 चौरस फूट घरं प्रकल्पग्रस्त कुटुंबांना दिली जातील.




Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता