दारूच्या नशेत मुलाने ८० वर्षीय आईचा घेतला जीव!

कणकवली: माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे घडली आहे. दारूच्या व्यसनाने एका मुलाला इतके हैवान बनवले की, त्याने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईचा निर्घृण खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.


प्रभावती सोरफ असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा रवींद्र सोरफ यानेच हा क्रूर प्रकार केल्याचा आरोप आहे. रवींद्रला दारूचे व्यसन असून, रात्रीच्या वेळी आई आणि मुलामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या रवींद्रने थेट कोयता घेऊन आपल्या आईवर वार केले. त्याने डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार करत तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला त्याने ओढत घरातल्या हॉलमध्ये आणले.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने कणकवली पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, प्रभावती सोरफ यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी रवींद्र सोरफ याला जागेवरून ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले की यामागे आणखी कोणते कारण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या शीव रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ

तब्बल १२० प्रत्यारोपण केले जाणार मुंबई (खास प्रतिनिधी) : शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर