अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने सोशल मिडियावर हा धक्कादायक किस्सा शेअर करत घटनाक्रम स्पष्ट केला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीत सांगितले की, शूटिंगसाठी चर्चगेटकडे जाताना साडी नेसून लोकल ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींना ट्रेन पकडायला जमले नाही. त्यामुळे करिश्माने धावत ट्रेनमधून उडी मारली आणि त्या दरम्यान ती पडली.


करिश्माच्या म्हणण्यानुसार, या अपघातामुळे तिला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पाठीवरही मार लागला आहे. तिला डोक्याला सूज आले असून डॉक्टरांनी तिला एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे. करिश्माने आपल्या फॉलोअर्सना सांगितले की, “कालपासून मला प्रचंड त्रास होतो आहे, पण मी धैर्य राखले आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.”


करिश्माच्या मैत्रिणीने देखील एक व्हिडीओ शेअर केला असून तिने लिहिले आहे की, “माझ्या मैत्रिणीला ट्रेनमधून पडलेले पाहून आम्ही तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले. सध्या तिला काही आठवत नाही. आम्ही तिच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो.”



करिश्मा शर्मा कोण आहे?


करिश्मा शर्मा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने ‘रागिणी एमएमएस रिटर्न्स’, ‘प्यार का पंचनामा’, ‘उजडा चमन’, ‘एक व्हिलन रिटर्न’ आणि ‘फिक्सर’ या सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या कामगिरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.


करिश्माच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही, मात्र तिच्या प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी तिला लवकर बरी व्हावे, अशी प्रार्थना केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला