मराठा आरक्षणाचा सप्टेंबरमध्ये काढलेला शासन निर्णय अडचणीत ? जरांगे काय करणार ?


मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला थांबवण्यासाठी राज्य शासनाने सप्टेंबर २०२५ मध्ये एक जीआर अर्थात शासन निर्णय जारी केला होता. या जीआरद्वारे ज्या मराठा व्यक्तीकडे कुणबी असल्याचे प्रमाणपत्र आहे त्याला विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ देण्याची तयारी राज्य शासनाने दाखवली होती. या शासन निर्णयालाच दोन याचिकांद्वारे न्यायालयातून आव्हान देण्यात आले आहे. जीआरमुळे मराठा समाजाला सरसरट आरक्षण मिळेल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल, असा दावाही करण्यात आला आहे.


न्यायालयात दाखल झालेल्या दोन याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणात आधीच ३६० पेक्षा जास्त जाती आहेत. या परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण दिल्यास आधीपासून ओबीसी प्रवर्गात असलेल्यांचेच आरक्षण अप्रत्यक्षरित्या कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच भीतीपोटी मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जीआरला आव्हान देण्यात आले आहे.


मनोज जरांगे यांना राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी जीआरची प्रत दिली. या जीआर विरोधात ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने याचिका दाखल केली. संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. तर दुसरी याचिका अ‍ॅड. विनित धोत्रे यांनी दाखल केली आहे.


जरांगेंना दिलेल्या जीआरच्या प्रतीमध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आल्याचा उल्लेख आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांनी हा जीआर बेकायदा असल्याचा दावा केला आहे. तसेच या जीआरद्वारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.


Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

भारताचा अमेरिकेला दणका, मॉरिशससोबत स्थानिक चलनात होणार व्यापार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रामुख्याने तेलाशी संबंधित व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत होता. पण भारताने

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

जगातील पहिले महिला नौकायन अभियान मुंबईत सुरू

मुंबई: ११ सप्टेंबर २०२५ रोजी इतिहासाची नोंद झाली, जेव्हा जगातील पहिले त्रि-सेवा सर्व-महिला नौकायन अभियान, "समुद्र

Nepal Violence : नेपाळमधून १५,००० कैदी फरार! भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं वातावरण

नेपाळ : नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीषण अशांतता आणि हिंसाचार सुरू आहे. सरकारने अचानक काही लोकप्रिय सोशल

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे