मराठा आरक्षणाचा सप्टेंबरमध्ये काढलेला शासन निर्णय अडचणीत ? जरांगे काय करणार ?


मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला थांबवण्यासाठी राज्य शासनाने सप्टेंबर २०२५ मध्ये एक जीआर अर्थात शासन निर्णय जारी केला होता. या जीआरद्वारे ज्या मराठा व्यक्तीकडे कुणबी असल्याचे प्रमाणपत्र आहे त्याला विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ देण्याची तयारी राज्य शासनाने दाखवली होती. या शासन निर्णयालाच दोन याचिकांद्वारे न्यायालयातून आव्हान देण्यात आले आहे. जीआरमुळे मराठा समाजाला सरसरट आरक्षण मिळेल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल, असा दावाही करण्यात आला आहे.


न्यायालयात दाखल झालेल्या दोन याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणात आधीच ३६० पेक्षा जास्त जाती आहेत. या परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण दिल्यास आधीपासून ओबीसी प्रवर्गात असलेल्यांचेच आरक्षण अप्रत्यक्षरित्या कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच भीतीपोटी मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जीआरला आव्हान देण्यात आले आहे.


मनोज जरांगे यांना राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी जीआरची प्रत दिली. या जीआर विरोधात ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने याचिका दाखल केली. संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. तर दुसरी याचिका अ‍ॅड. विनित धोत्रे यांनी दाखल केली आहे.


जरांगेंना दिलेल्या जीआरच्या प्रतीमध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आल्याचा उल्लेख आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांनी हा जीआर बेकायदा असल्याचा दावा केला आहे. तसेच या जीआरद्वारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.


Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय