दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय

वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न


भाईंदर (वार्ताहर) : दहिसर चेक नाक्यावरील टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लहान वाहनांना टोल माफीसह अनेक उपाय योजना करूनही वाहतूक कोंडीत फरक पडला नाही त्यामुळे इंधनाचा अपव्यय, वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी यावर आता दहिसर टोल नाका तेथून २ किलोमीटर पुढे स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची तसेच सदर प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


टोल नाक्यामुळे रोज दिवसभर तर सकाळ संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. लहान वाहनांना टोल माफीसह अनेक उपाय योजना केल्या परंतु काहीच फरक पडला नाही. त्यामुळे सदर टोल नाका दोन किलोमीटर पुढे नेण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. बैठकीत दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, टोल ठेकेदार विरेंद्र म्हैसकर इतर अधिकारी उपस्थित होते त्यात टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची 8 ऑक्टोबरला प्रसिद्धी

मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची

एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स !

मुंबई : आजचा काळ म्हणजे वेगवान जीवनशैली आणि सततची स्पर्धा. या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण