छत्तीसगड : गरियाबंदमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण


रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज, गुरुवारी चकमक झाली. यात १० माओवादी ठार झाले आहेत. दरम्यान राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.


यासंदर्भातील माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये बालकृष्ण उर्फ मनोज याचा समावेश आहे, मनोजवर सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गरियाबंदच्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलांमध्ये नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. या मोहिमेत ई-30, एसटीएफ आणि कोब्रा कमांडोंच्या टीम्स सहभागी होत्या. आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी काही स्वयंचलित (ऑटोमॅटिक) शस्त्रास्त्रही सापडली आहेत.


दरम्यान नारायणपूर जिल्ह्यात आज, गुरुवारी १६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, माओवाद्यांची ‘पोकळ’ विचारधारा, निष्पाप आदिवासींवर केलेले अत्याचार, आणि संघटनेतील अंतर्गत मतभेद यामुळे निराश होऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला.


हे सर्व माओवादी खालच्या स्तरावरील कार्यकर्ते होते. ते जनताना सरकार, चेतना नाट्य मंडळी आणि माओवादी पंचायत मिलिशिया यांसारख्या विविध युनिट्सशी संबंधित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी संघटनेतील त्यांची भूमिका निम्न स्तराची होती, तरीही त्यांनी नक्षल चळवळ जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Comments
Add Comment

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की