छत्तीसगड : गरियाबंदमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण


रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज, गुरुवारी चकमक झाली. यात १० माओवादी ठार झाले आहेत. दरम्यान राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.


यासंदर्भातील माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये बालकृष्ण उर्फ मनोज याचा समावेश आहे, मनोजवर सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गरियाबंदच्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलांमध्ये नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. या मोहिमेत ई-30, एसटीएफ आणि कोब्रा कमांडोंच्या टीम्स सहभागी होत्या. आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी काही स्वयंचलित (ऑटोमॅटिक) शस्त्रास्त्रही सापडली आहेत.


दरम्यान नारायणपूर जिल्ह्यात आज, गुरुवारी १६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, माओवाद्यांची ‘पोकळ’ विचारधारा, निष्पाप आदिवासींवर केलेले अत्याचार, आणि संघटनेतील अंतर्गत मतभेद यामुळे निराश होऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला.


हे सर्व माओवादी खालच्या स्तरावरील कार्यकर्ते होते. ते जनताना सरकार, चेतना नाट्य मंडळी आणि माओवादी पंचायत मिलिशिया यांसारख्या विविध युनिट्सशी संबंधित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी संघटनेतील त्यांची भूमिका निम्न स्तराची होती, तरीही त्यांनी नक्षल चळवळ जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात