छत्तीसगड : गरियाबंदमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण


रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज, गुरुवारी चकमक झाली. यात १० माओवादी ठार झाले आहेत. दरम्यान राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.


यासंदर्भातील माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये बालकृष्ण उर्फ मनोज याचा समावेश आहे, मनोजवर सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गरियाबंदच्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलांमध्ये नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. या मोहिमेत ई-30, एसटीएफ आणि कोब्रा कमांडोंच्या टीम्स सहभागी होत्या. आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी काही स्वयंचलित (ऑटोमॅटिक) शस्त्रास्त्रही सापडली आहेत.


दरम्यान नारायणपूर जिल्ह्यात आज, गुरुवारी १६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, माओवाद्यांची ‘पोकळ’ विचारधारा, निष्पाप आदिवासींवर केलेले अत्याचार, आणि संघटनेतील अंतर्गत मतभेद यामुळे निराश होऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला.


हे सर्व माओवादी खालच्या स्तरावरील कार्यकर्ते होते. ते जनताना सरकार, चेतना नाट्य मंडळी आणि माओवादी पंचायत मिलिशिया यांसारख्या विविध युनिट्सशी संबंधित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी संघटनेतील त्यांची भूमिका निम्न स्तराची होती, तरीही त्यांनी नक्षल चळवळ जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Comments
Add Comment

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.