नेपाळमधून फरार झालेले कैदी भारतात प्रवेश करताना सापडले

काठमांडू : नेपाळमधील परिस्थिती आता अत्यंत गंभीर बनली आहे. आंदोलनकर्त्यांचा रोष कमी होण्याचं नाव घेत नाही.अशातच आता नेपाळमधील १८ जिल्ह्यांतील कारागृहांमधून सुमारे ६,००० कैदी पळून गेले आहेत. दरम्यान नेपाळच्या तुरुंगातून फरार झालेले ५ कैदी भारत-नेपाळ सीमेद्वारे भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांना अटक करण्यात आली.


सशस्त्र सीमा बल (एसएसबी) ने या ५ कैद्यांना भारतात घुसण्याचा प्रयत्न करताना पकडले. ही घटना सिद्धार्थनगर परिसरातील भारत-नेपाळ सीमेजवळ घडली. त्यानंतर या सर्व कैद्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. अटक केलेल्या या कैद्यांनी सांगितले की, “नेपाळमधील परिस्थिती अत्यंत भीषण आहे, तिथे लोकांना ठार मारले जात आहे. आम्ही नेपाळमध्ये परत जाणार नाही, भारतीय तुरुंगात राहायला तयार आहोत.


नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्यामुळेच ही आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जेन-झेड (तरुण पिढी) सहभागी झाली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांची आणि सुरक्षा दलांशी झडप झाली, ज्यामध्ये २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.


काठमांडूसह इतर जिल्ह्यांमध्येही आंदोलनं पसरली आणि त्याने हिंसक वळण घेतले.अनेक नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. पंतप्रधान के. पी. ओली यांच्या राजीनाम्यानंतरही संताप कमी झाला नाही. अनेक सरकारी इमारतींना आग लावण्यात आली. सध्या संपूर्ण नेपाळमध्ये परिस्थिती अगदी पेटलेली आहे.


आता सैन्याने देशाची सूत्रं हातात घेतली असून संपूर्ण देशात कर्फ्यू लागू केला आहे. सैन्य आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

Comments
Add Comment

PM Modi on Nepal Violance: नेपाळमधील जाळपोळीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड अराजकता माजली आहे.  सोशल मीडियावरील बंदीवरून सुरू झालेलं Gen

योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

काठमांडू : भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मागील ४-५ वर्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. आधी अफगाणिस्तान,

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे, हिंसक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय

काठमांडू: नेपाळ सरकारने देशात सुरू असलेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनानंतर अखेर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा