अजितदादांना झालेय तरी काय? आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द...

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे काल पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीत गैरहजर राहिले, त्यानंतर त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे, अजितदादांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न प्रत्येकांना पडला आहे. अजित पवार यांचे एकामागून एक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

काल, मंगळवारी रात्री वरळी डोम येथे पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पक्षाच्या आगामी रणनीती, संघटनात्मक बदल आणि स्थानिक निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पण इतक्या महत्वाच्या बैठकीत अजित पवार यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर आजही अजितदादांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित पवार आजारी असल्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे या प्रकरणी नाराजी देखील व्यक्त केली होती.  या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सरकारमध्ये अजितदादा एकटे पडले आहेत का? की अजून काही राजकीय कारण आहे? अशा अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Comments
Add Comment

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी