गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी


मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तब्बल ३३ तासांनंतर पार पडलेल्या या विसर्जनामुळे आणि तेही चंद्रग्रहणाच्या वेळेत झाल्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत आहे. यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



विलंबाचे कारण आणि कोळी बांधवांचा संताप


यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून खास तराफा मागवण्यात आला होता, मात्र या तराफामुळेच विसर्जन प्रक्रिया १३ ते १४ तास रखडली. यामुळे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करणारे मुंबईतील कोळी बांधव संतप्त झाले आहेत. त्यांनी याला "बाप्पा आणि समस्त कोळी समाजाचा अपमान" असे म्हटले आहे. वर्षानुवर्षे कोळी समाज हा विसर्जन सोहळा यशस्वी करत आला आहे, मात्र यंदा त्यांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.



मच्छिमार समितीच्या ४ प्रमुख मागण्या


१. दोषींवर गुन्हे दाखल करा: विसर्जन सोहळ्याला विलंब झाल्यामुळे आणि चंद्रग्रहणात विसर्जन झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. याला जबाबदार असलेल्या मंडळाच्या कार्यकारी समितीतील सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.


२. कार्यकर्त्यांवर कारवाई करा: विसर्जन सोहळ्यादरम्यान कोळी बांधवांना चुकीची वागणूक देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी. जर तो पोलीस किंवा उद्योपतीचा सुरक्षा रक्षक असेल, तर त्याला सेवेतून बडतर्फ करावे.


३. दर्शन पद्धतीत बदल: दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी आणि 'व्हीआयपी संस्कृती' यामुळे सामान्य भाविकांना त्रास होतो. व्हीआयपी दर्शनासाठी केवळ एक दिवस ठेवावा आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी देखाव्याचा पंडाल मोकळा करावा.


४. इतिहासाचा सन्मान राखा: १९३४ मध्ये लालबागच्या राजाची स्थापना कोळी समाजातील महिलांनी त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल केली होती, या इतिहासाचा मंडळाने आदर करावा.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस