उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग, धुराचे प्रचंड लोट

उरण: उरणमधील महत्वपूर्ण आणि अति संवेदनशील ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसून येत आहे.  बातमी समजताच, तात्काळ  सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.  आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याकारणामुळे, आगीचे लोळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.  या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही आग तात्काळ विजवणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हंटले जात आहे.


याच प्रकल्पाला काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे भीषण आग लागली होती. दिनांक ३ सप्टेंबर २०१९ रोजी उरण ओएनजीसीला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आजची घटना सहा वर्षापूर्वीच्या त्या घटनेची आठवण करून देत आहे.



 
Comments
Add Comment

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन