उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग, धुराचे प्रचंड लोट

उरण: उरणमधील महत्वपूर्ण आणि अति संवेदनशील ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसून येत आहे.  बातमी समजताच, तात्काळ  सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.  आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याकारणामुळे, आगीचे लोळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.  या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही आग तात्काळ विजवणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हंटले जात आहे.


याच प्रकल्पाला काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे भीषण आग लागली होती. दिनांक ३ सप्टेंबर २०१९ रोजी उरण ओएनजीसीला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आजची घटना सहा वर्षापूर्वीच्या त्या घटनेची आठवण करून देत आहे.



 
Comments
Add Comment

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास, पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार, तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू

पालघर : भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये स्थानिक तरुणांना नोकरीची संधी

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन