लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?


मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन होण्यास यंदा उशीर होत आहे. लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले. सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. पण दोन तास गणपती किनाऱ्यावरच होता.


लालबागच्या राजाची मिरवणूक वाजतगाजत आणि गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर पोहोचली. चौपाटीवर गणपतीच्या विसर्जनाची तयारी झाली. यानंतर लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर शेवटची आरती झाली. नंतर लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले.


विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांच्यात समन्वय राखण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळे विसर्जन रखडले. आता दुपारी किंवा संध्याकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.


परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोळी बांधवांची मदत घेतली जात आहे. भरतीनंतर ओहोटी येईल. ओहोटी येईपर्यंत थांबावे असा सल्ला कोळी बांधवांनी मंडळाला दिला आहे. समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जन होऊ शकेल, असे चित्र आहे.


Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य