लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?


मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन होण्यास यंदा उशीर होत आहे. लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले. सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. पण दोन तास गणपती किनाऱ्यावरच होता.


लालबागच्या राजाची मिरवणूक वाजतगाजत आणि गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर पोहोचली. चौपाटीवर गणपतीच्या विसर्जनाची तयारी झाली. यानंतर लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर शेवटची आरती झाली. नंतर लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले.


विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांच्यात समन्वय राखण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळे विसर्जन रखडले. आता दुपारी किंवा संध्याकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.


परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोळी बांधवांची मदत घेतली जात आहे. भरतीनंतर ओहोटी येईल. ओहोटी येईपर्यंत थांबावे असा सल्ला कोळी बांधवांनी मंडळाला दिला आहे. समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जन होऊ शकेल, असे चित्र आहे.


Comments
Add Comment

Mumbai Fire News : जोगेश्वरीतील 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर'ला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 'लेव्हल-२' घोषित, पण मोठी दुर्घटना टळली

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम (Jogeshwari West) परिसरात आज, गुरुवारी सकाळी 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर' या उंच इमारतीला भीषण

भाऊबीज : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण

मुंबई: भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, आपुलकी आणि

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; सुमारे १९.७८ कोटींचे 'हायड्रोपोनिक वीड' जप्त, तिघांना अटक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA), मुंबई कस्टम्स झोन-III च्या अधिकाऱ्यांनी २० आणि २१ ऑक्टोबर

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय