मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' जाहिराती मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने दिल्या, रोहित पवारांचा दावा


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर झळकवण्यात आले. 'देवाभाऊ' नावाने जाहिरात मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेविषयी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची संमती न घेता महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षातील एका मंत्र्याने 'देवाभाऊ' नावाची जाहिरात मोहीम राबवली, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.


पावसामुळे शेतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अडीअडचणींमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या भाजपच्या मित्रपक्षातील एका मंत्र्याने 'देवाभाऊ' नावाची जाहिरात मोहीम राबवल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.


मित्रपक्षाच्या मंत्र्याने मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या ? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले ? हा मंत्री कोण ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. जाहिराती देणारी व्यक्ती समोर आल्यास अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले.




Comments
Add Comment

Gold Silver Rate Today: सलग दोन दिवस उसळलेले सोने आज घसरले 'हे' आहे सोन्याचे जागतिक विश्लेषण

मोहित सोमण: सोन्यातील विशेषतः एकूणच कमोडिटीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढल्याने दोन विरुद्ध दिशेने कमोडिटी

उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी; शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा जाहीर पाठिंबा

मुंबई: राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला वेग; १७ वर्षांचा आर्थिक लेखाजोखा मागवला

मुंबई : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी सुरू

प्रवाशांचा हल्लाबोल होणार ? सहा विमानतळावरील इंडिगोची १८० पेक्षा अधिक विमान रद्द

मुंबई: देशांतर्गत चालणारी मोठी विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) १८० पेक्षा अधिक विमाने रद्द केली आहेत. आज सकाळी

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक

फिचने जीडीपी भाकीत ६.९% वरून ७.४% पातळीवर वाढवले अर्थव्यवस्थेचा प्रवास सुसाट 'या' कारणामुळे अपेक्षित

प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्थेची पाळेमुळे पाहता प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय