Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश कोमकर (Govinda Komkar) या तरूनवर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. आयुष कोमकर क्लासवरुन परत येताच त्याच्यावर हल्लेखोराकडून गोळ्या झाडल्या गेल्या, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुणे पोलिस अॅक्शन मोड वर आहेत.

याबद्दल अधिकृत माहिती अशी की, रात्री पावणेआठच्या सुमाराला आयुष कोमकर या युवकाची क्लासमधून परत आल्यावर अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी होता. तो वनराज आंदेकरचा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या सहा टीम रवाना करण्यात आल्या आहेत. याबाबत काही सुगावे लागल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
Comments
Add Comment

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात

राज्यात अतिवृष्टीमुळे १४.४४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी