Anant Chaturdashi 2025: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई: अनंत चतुर्थीनिमित्त (Anant Chaturdashi 2025) मुंबईसह अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली आहे. यादरम्यान काही दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्त्यांचे देखील विसर्जन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला देखील आज पारंपरिक आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वर्षा येथील एका कृत्रिम तलावात देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासह गणेश मूर्ती विसर्जित केली. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आला आहे.

 



यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले की, "आज आपण वर्षा येथे एका कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले. बाप्पांनी आपल्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला १० दिवसांसाठी आशीर्वाद दिला. राज्यात मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणि मला आशा आहे की सर्व काही शांततेत पार पडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल"
Comments
Add Comment

घरगुती गुंतवणूकदारांची सत्वपरीक्षा ! शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत घसरण 'या,' जागतिक कारणांमुळे

मोहित सोमण : आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात अपेक्षित घसरण कायम राहिली असून सेन्सेक्स

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या