आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २ दिवसांची विशेष कॅज्युअल रजा देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ही रजा १४ आणि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी 'मातृ-पितृ वंदना' योजनेअंतर्गत दिली जाईल. परंतु, या रजेसाठी कर्मचाऱ्यांना विहित पोर्टलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी २०२१ मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या पहिल्या भाषणात ही योजना जाहीर केली होती. अधिसूचनेत म्हटले आहे की, "आसामचे राज्यपाल 'मातृ-पितृ वंदना' योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना १४ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) आणि १५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) रोजी विशेष कॅज्युअल रजेची घोषणा करताना आनंद होत आहे. यासोबतच, अधिसूचनेत असेही नमूद केले आहे की, कर्मचारी या योजनेअंतर्गत १६ नोव्हेंबर (रविवार) ची रजा देखील या सुट्ट्यांसह एकत्र करू शकतात.


ही विशेष रजा देण्यामागील उद्देश असा आहे की, कर्मचारी त्यांच्या वृद्ध पालकांसोबत किंवा सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवू शकतील. त्यांचा आदर करता येईल आणि त्यांची काळजी घेतली जाऊ शकेल. कर्मचारी त्यांच्या मनोरंजनासाठी या रजा घेऊ शकणार नाहीत. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांचे पालक किंवा सासू-सासरे नाहीत त्यांना या रजा मिळणार नाहीत.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल