मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कुणाची लागणार वर्णी?

मुंबई : मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कोणत्या महिला पदाधिकाऱ्याची वर्णी लागते. सध्याच्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची नियुक्ती आता माहिम मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्षपद रिक्त असून यासाठी चर्चेत असणारी बहुतांशी सर्वच नावे मागे पडली आहेत. त्यामुळे आता या पदावर माजी नगरसेविकांपैंकी कुणाला संधी दिली जाते की महिला पदाधिकाऱ्यांमधून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई भाजपमध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची निवड नेहमीच महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या रिक्त पदासाठी अनेक अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. सध्या या पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. यामध्ये अनेक विद्यमान नगरसेविका आणि अनुभवी महिला नेत्यांचा समावेश आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या आणि महिलांमध्ये चांगली पकड असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यात काही नवी नावे सुद्धा पुढे येत आहेत, जी नव्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने पक्षाला नवी दिशा देऊ शकतात.


सुरुवातीला या पदासाठी शलाका साळवी, अक्षता तेंडुलकर, राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, रितु तावडे, योजना ठोकळे, आशा मराठे आणि प्रीती सातम यांची नार्वे चर्चेत होती. परंतु त्यांच्यावर अन्य जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना ठोकळे, राजेश्री शिरवडकर यांची नावे शिल्लक असली तरी या नवनिर्वाचित मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासोबत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी तेवढ्याच तोडीची आणि अभ्यासू तथा आक्रमक महिला अध्यक्षाची निवड करणे आवश्यक असेल. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चेतील नावांव्यतिरिक्त अन्य महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाबाबत मंथन सुरू असून लवकरच नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई