मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणेश विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोर पकडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे, ज्यामुळे शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.


हवामान विभागानुसार, शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवार सायंकाळपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर रविवारी पावसाचा जोर कमी होईल. कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता, मात्र आता हा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे.



ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी


हवामान विभागाने ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे, तर विदर्भात केवळ हलक्या सरींचा अंदाज आहे.



धरणे भरली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


राज्यातील चांगल्या पावसामुळे अनेक धरणे भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे, मात्र धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण वाढेल.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर