मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार


नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मेईतेई समाजात तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सरकारला मोठे यश मिळाले. केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी कुकी-झो कौन्सिल (केझेडसी) सोबत एक नवीन करार केला आहे. ज्याअंतर्गत सर्व पक्षांनी राज्याची प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-२ (NH-2) उघडण्यास सहमती दर्शविली.

गेल्या काही दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीच्या शिष्टमंडळात अनेक बैठका झाल्या. मणिपूरमध्ये कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी संवादाद्वारे तोडगा काढण्याच्या गरजेवरही तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील संघर्ष कायमचा संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इम्फाळ आणि नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, आवश्यक वस्तूंची सहज उपलब्धता विस्थापित कुटुंबे आणि मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी कमी करेल.

हा निर्णय मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती परत आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मैतेयी आणि कुकी-झो समुदायांमध्ये तणाव सुरू असल्याने हा महामार्ग बंद होता. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अडला नाही, तर सामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आता कुकी-झो कौन्सिलने केंद्र सरकारसोबत समन्वय करून हा महामार्ग पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, जेणेकरून मणिपूरच्या जनतेला दिलासा मिळू शकेल.
Comments
Add Comment

करूर चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४० वर, करूर दुर्घटनेतील ४० पैकी ३५ मृतदेहांची ओळख पटली; टीव्हीके पक्षाची उच्च न्यायालयात स्वतंत्र चौकशीची मागणी

चेन्नई : अभिनेता आणि तमिलगा वेट्री कळघम पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या करूर येथील प्रचार सभेत झालेल्या भीषण

'मन की बात': मोदींचा स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह; महिला आणि परंपरांचा गौरव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १२६ व्या भागात

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या