Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,  मृतांचा आकडा आतापर्यंत ४३ वर पोहोचला आहे. पंजाब सरकारने यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे ही आकडेवारी समोर आली आहे. पंजाब १९८८ नंतरच्या सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे.


मृतांमध्ये अमृतसरमधील ४, बरनालामधील ५, होशियारपूरमधील ७, भटिंडामधील ३, गुरुदासपूरमधील १, लुधियानामधील ४, मानसामधील ३, पठाणकोटमधील ६, पटियालामधील १, रूपनगरमधील १ आणि मोहाली आणि संगरूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.


सरकारच्या परिपत्रकानुसार, पंजाबमधील २३ जिल्हे आणि १६५५ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पंजाबमधील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या तीन लाख ५५ हजार ७०९ इतके आहे.अमृतसरमध्ये पुरामुळे बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १७ हजार ५३४ आहे. त्यानंतर गुरुदासपूरमध्ये १ लाख ४५ हजार लोक तर फिरोजपूरमध्ये ३९हजार ०७६, पठाणकोटमध्ये १५हजार ०७३, कपूरथलामध्ये ५ हजार ७२८ आणि मोहालीमध्ये ७ हजार लोक बाधित झाले आहेत.


पुराच्या पाण्यातून वाचविण्यात आलेल्या लोकांची संख्या १९हजार ४७४ वर पोहोचली आहे. गुरुदासपूरमधून सर्वाधिक ५५८१ लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. तर अमृतसरमधून २७३४, बरनालामधून ३६९, फाजिल्कामधून २४२२, फिरोजपूरमधून २४९५, गुरुदासपूरमधून ५५८१ लोकांना वाचवण्यात आले. तसेच होशियारपूरमधून १६१५, जालंधरमधून ४७४, कपूरथळामधून १४२८, मानसामधून १६, मोगामधून ११५, रोपरमधून ६५, पठाणकोटमधून ११३९, तरनतारनमधून २१ लोकांना वाचवण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण १९ हजार ४७४ लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.


बचाव कार्य करण्यासाठी बाधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या ३१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या बारा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, तर ८ तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ३० हून अधिक हेलिकॉप्टर बचाव आणि मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. बीएसएफ देखील राज्य सरकारला बचाव कार्यात मदत करत आहे, तर राज्य सरकारने बचाव कार्यासाठी १२३ बोटी पुरवल्या आहेत.

Comments
Add Comment

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर

मुस्लीमबहुल भागात एनडीएची सरशी

पटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने