निवडणूक आयोगाची ४४ राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस


मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (केंद्रीय निवडणूक आयोग) ४४ राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पक्षांची महाराष्ट्रातील नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोगाने ज्या ४४ पक्षांना नोटीस बजावली आहे त्यांनी २०१९ पासून आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि इतर पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. या पक्षांमध्ये आम जनता पार्टीसह, अखंड भारतीय आवाज, अखिल भारतीय जनहित पार्टी यांसारख्या पक्षांचा समावेश आहे.


राज्यातील ४४ अप्रमाणित राजकीय पक्षांनी २०१९ पासून आतापर्यंत लोकसभा, विधानसभा आणि इतर पोटनिवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नाही. निवडणुकाच लढवलेल्या नाहीत. यामुळे या पक्षांची नोंदणी रद्द का करू नये, असा प्रश्न निवडणूक आयोगाने उपस्थित केला आहे. कारवाई करण्याआधी बाजू मांडण्याची संधी म्हणून निवडणूक आयोगाने ४४ अप्रमाणित राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्याआधीच निवडणूक आयोगाने ४४ अप्रमाणित राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पक्षांची महाराष्ट्रातील नोंदणी रद्द झाली तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाही.


कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या पक्षांना त्यांची बाजू मांडण्यासाठी मर्यादीत कालावाधी उपलब्ध आहे. नोटीसला पक्षांनी दिलेले उत्तर समाधानकारक आहे की नाही, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. निवडणूक आयोगाचे समाधान झाले नाही तर संबंधित राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे.


नोटीस बजावलेल्या पक्षांना त्यांची बाजू १० आणि ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्यासमोर मांडण्याची संधी आहे. नोटीस बजावलेल्या पक्षांमध्ये आम जनता पार्टीसोबतच अखंड भारतीय आवाज, अखिल भारतीय जनहित पार्टी, अखिल भारतीय लोकाधिकार पार्टी, ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, भारत जनसंग्राम पार्टी, भारत उदय मिशन, भारतीय परिवर्तन काँग्रेस, भारतीय जनहित काँग्रेस पार्टी असे एकूण ४४ अप्रमाणित राजकीय पक्ष आहेत.


Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविलेल्या उपक्रमामुळे कैद्यांचे यशस्वी पुनर्वसन

मुंबई : गुन्हेगारीचा रस्ता सोडून कैद्यांनी पुन्हा एकदा समाजाच्या प्रवाहात यावे. भूतकाळ विसरून सन्मानाने जीवन

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Child mortality : बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्राचा 'मास्टर प्लॅन'; आरोग्य, आदिवासी आणि महिला-बालविकास विभाग एकत्र येणार!

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण आणखी कमी

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

Asian Games Controversy : टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा कायदेशीर कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने (Manika Batra) 'टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया' (टीटीएफआय)

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा