संघाला तारणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे द्विशतक थोडक्यात हुकले

श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद


मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून बीसीसीआयच्या बंगळूरुतील सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानात पश्चिम विभाग आणि मध्य विभाग संघात उपांत्य सामना खेळला जात आहे. गुरुवारपासून (४ सप्टेंबर) हा सामना सुरू झाला आहे. सामन्याचा पहिला दिवस पश्चिम विभागाच्या ऋतुराज गायकवाडने गाजवला आहे. पण त्याचे द्विशतक अगदी थोडक्यात हुकले.


या सामन्यात पश्चिम विभागाचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या ४ षटकातच त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. सलामीला खेळायला आलेले यशस्वी जैस्वाल ४ धावांवर आणि हार्विक देसाई १ धाव करून बाद झाले.


जैस्वालला खलिल अहमदने, तर हार्विकला दीपक चाहरने बाद केले. पण नंतर आर्य देसाई आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. पण हर्ष दुबेने २७ व्या षटकात आर्य देसाईला चकवले आणि ३९ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर श्रेयस अय्यरने काही काळ ऋतुराजची साथ दिली. त्यांच्यातील भागीदारी दरम्यान ऋतुराजने त्याचे अर्धशतक साजरे केले. पण श्रेयसला ३६ व्या षटकात खलील अहमदने २५ धावांवर त्रिफळाचीत केले. शम्स मुलानीही १८ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर तनुष कोटियनने ऋतुराजची भक्कम साथ दिली. या दरम्यान १३१ चेंडूत ऋतुराजने शतक झळकावले. त्यानंतर त्याने धावांची गती आणखी वाढवली होती. त्याने दीडशतक पूर्ण केल्यानंतर तो पहिले द्विशतकही पहिल्याच दिवशी करेल, असे चित्र समोर दिसत होते.



भारतीय संघाचे ठोठावले दरवाजे


सारांश जैनने ७५ व्या षटकात ऋतुराजला बाद केले. ऋतुराज २०६ चेंडूत १८४ धावा करून यष्टीचीत झाला. त्याने या खेळीदरम्यान २५ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचं द्विशतक थोडक्यात १६ धावांनी हुकले. मात्र संघ दबावात असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऋतुराजने केलेल्या या खेळीमुळे त्याने सर्वांचे लक्ष पुन्हा वेधले असून भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. तो वर्षभरापासून भारतीय संघातून दूर आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने तनुष कोटियनसोबत ६ व्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारीही केली. या भागीदारीदरम्यान तनुषनेही अर्धशतक
पूर्ण केले.



पहिल्या दिवशी पश्चिम विभागाने ओंलाडला साडेतीनशेचा टप्पा


दरम्यान, ऋतुराज बाद झाल्यानंतरन तनुषने शार्दुल ठाकूरला साथीला घेत डाव पुढे नेला. त्यामुळे पश्चिम विभागाने ३५० धावांचा टप्पा पहिल्याच दिवशी ओलांडला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाने ८७ षटकात ६ बाद ३६३ धावा केल्या. मध्य विभागाकडून पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना खलीली अहमद आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर हर्ष दुबे आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Comments
Add Comment

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी