नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात ५० हून अधिक बिबटे असण्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवली जात आहेत. त्र्यंबकेश्वरजवळ पहिने ग्रामपंचायत हद्दीतील व त्र्यंबक वन परिक्षेत्रातील नियतक्षेत्र बोरीचीवाडी येथे म्हसाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या अडकला होता. वन विभागाने त्याला जेरबंद केले.

गुरुवारी पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास बिबट्या कोंबड्या खाण्यासाठी एका ठिकाणी फाटलेल्या जाळीतून आत घुसला. जाळीच्या आत जास्त कोंबड्या नव्हत्या. त्यामुळे तीन-चार कोंबड्या फस्त करून, बिबट्याबाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला बाहेर येता येईना.

विशेष म्हणजे, ज्या फटीतून तो आत घुसला, ती फटही आपोआप पुनः पूर्ववत झाली. त्यामुळे त्याचे बाहेर पडण्याचे मार्गच बंद झाले. दरम्यान, पोल्ट्रीफॉर्म मालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्र्यंबकेश्वर वनविभागाशी संपर्क साधला, त्यानुसार, त्र्यंबक रेंज स्टाफ व नाशिकच्या इसीओ इसीएचओ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी बिबट्याला गनद्वारे भूलीचे इंजेक्शन देऊन रेस्क्यू करण्यात आले. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपाल अरुण निंबेकर, वनरक्षक रवी मौळे, दीपक जगताप, बबलू, दिवे, कैलास महाले आदी कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीमने ही मोहीम राबविली.
Comments
Add Comment

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित

कोलकाता-श्रीनगर इंडिगो विमानात इंधन गळती, वाराणसीत आपत्कालीन लँडिंग; १६६ प्रवासी सुखरूप

वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे

ठाणे स्टेशनजवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; 'टकल्या' ऊर्फ नितेश शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल, शोध मोहीम सुरू

ठाणे: कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला आज पहाटेच्या सुमारास ठाणे स्टेशनजवळील परिसरात एका सराईत

भारताच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राला जगभरातून मागणी

नवी दिल्ली : भारताची स्वदेशी आकाश मिसाईल सिस्‍टमवर आता जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. जगातील 6 ते 7 देश विविध

महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान