...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या


मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या या कबड्डीपटूने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करताना चिठ्ठी किंवा कोणताही संदेश मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बाबत सखोल चौकशी केली आणि नैराश्यातून कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली. वांद्रे पोलीस या प्रकरणात अद्याप तपास करत आहेत.


हाती आलेल्या माहितीनुसार कबड्डीपटू मोहम्मद आसिफ खान आई आणि भावासोबत वांद्रे परिसरात राहत होता. बुधवार ३ सप्टेंबर रोजी मोहम्मदची आई कामानिमित्त घराबाहेर होती. मोहम्मदचा भाऊ कॉलेजला गेला होता. घरात कोणीही नव्हते. त्यावेळी मोहम्मद आसिफ खानने गळफास घेऊन जीवन संपवले. शेजाऱ्यांना जेव्हा मोहम्मदने आत्महत्या केल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मोहम्मदला तातडीने भाभा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मोहम्मदचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी