"पंतप्रधान मोदी खूपच हुशार" अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याने ट्रम्प यांना भारताची माफी मागण्याचे केले आवाहन

टॅरिफ शून्य करून भारताची माफी मागण्याचे एडवर्ड प्राइस यांनी डोनाल्ड ट्रम्पना केले आवाहन


वॉशिंग्टन: भारत-अमेरिका संबंध डोनाल्ड ट्रंप यांच्या ५० टक्के टॅरिफमुळे चांगलेच बिघडलेले दिसत आहेत. त्यात आता या विषयावर अमेरिकेतूनच ट्रंप यांच्या निर्णयावर जोरदार विरोध होताना पहायला मिळत आहे. अलीकडेच, न्यू यॉर्क विद्यापीठातील सहायक प्राध्यापक आणि अमेरिकेच्या गृह विभागाचे माजी प्रवक्ते एडवर्ड प्राइस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरील ५० टक्के टॅरिफ ताबडतोब मागे घेण्याचे, ते शून्यावर आणण्याचे आणि भारताची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोदी खूप हुशार आहेत असे कौतुक देखील त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे केले आहे.


जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लोकशाही देश आणि क्वाड सुरक्षा गटाचा आधारस्तंभ असलेला भारत, इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा भाग बनला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ आक्रमकतेमुळे विश्वास निर्माण करण्याच्या अनेक वर्षांच्या प्रगतीला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा प्राइस यांनी दिला.



भारताची माफी मागावी


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एडवर्ड प्राइस म्हणाले, “भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाची भागीदारी आहे. ही भागीदारी चीन आणि रशियामध्ये काय घडते हे ठरवेल. २१ व्या शतकात भारताची भूमिका निर्णायक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनशी संघर्ष करत आहेत, रशियाशी युद्धाबाबत वाटाघाडी करत आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ का लादले हे मला समजत नाही.”



पंतप्रधान मोदी खूपच हुशार


यावेळी एडवर्ड प्राइस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे अमेरिका, रशिया आणि चीनबरोबर एकत्रित वाटचाल करण्याच्या क्षमतेबद्दल कौतुक केले. “पंतप्रधान मोदी खूपच हुशार आहेत. ते अमेरिकन लोकांना, माझ्यासारख्या लोकांना आठवण करून देत आहेत की त्यांच्याकडे पर्याय आहेत, परंतु त्यांनी चीन आणि रशियाला पूर्णपणे स्वीकारलेले नाही.”

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल