दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक


मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील पार्किंगमध्ये आग लागली. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ जवळ रेल्वे स्टेशनच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये आग लागली, या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. आग लागल्यामुळे खाक झालेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. किमान १५ दुचाकींना तर अवघ्या काही मिनिटांत आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.


आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. वाहन तळ परिसरात असलेल्या लोकांनी तातडीने अनेक वाहने सुरक्षित ठिकाणी नेली. वाहन तळावरील अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने अग्निशमन उपकरण वापरुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पोलीस आणि अग्निशमन दल आग लागण्याचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी करत आहे.


Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य