डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल १०० कोटींचा टप्पा ओलांडून १००२.८५ दशलक्ष (सुमारे १००.२८ कोटी) वर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ही वाढ मार्च २०२५ च्या तिमाहीच्या तुलनेत ३.४८ टक्के आहे.


या अहवालातून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ९५.८१ कोटी ग्राहक वायरलेस इंटरनेटचा वापर करतात, तर केवळ ४.४७ कोटी ग्राहकांकडे वायरड इंटरनेट कनेक्शन आहे. ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या ३.७७ टक्क्यांनी वाढून ९७.९७ कोटी झाली आहे, तर नॅरोबँड वापरकर्त्यांची संख्या २.३१ कोटींवर आली आहे. यामुळे देशाची एकूण दूरसंचार घनता वाढून ८६.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी मागील तिमाहीत ८५.०४ टक्के होती.



शहरी आणि ग्रामीण भागातील वाढ


आकडेवारीनुसार, शहरी भागातील इंटरनेट ग्राहकांची संख्या ५७.९४ कोटी आहे, तर ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या ४२.३३ कोटी आहे. ही आकडेवारी डिजिटल इंडियाच्या वाढीची स्पष्ट साक्ष देते. दूरसंचार क्षेत्रातील मासिक सरासरी प्रति ग्राहक महसूल (ARPU) वायरलेस सेवांसाठी १८६.६२ रुपये इतका आहे.



दूरसंचार क्षेत्राचा महसूल वाढला


समायोजित सकल महसूल ८१,३२५ कोटी रुपये असून, तो मागील तिमाहीच्या तुलनेत २.६५ टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये प्रवेश सेवांचा वाटा ८३.६२ टक्के आहे. तसेच परवाना शुल्क २.६३ टक्क्यांनी वाढून ६,५०६ कोटी रुपये झाला आहे, तर पास-थ्रू शुल्क १९.४५ टक्क्यांनी घटून १०,४५७ कोटी रुपये झाला आहे.


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुमारे ९१२ खाजगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सना अपलिंकिंग किंवा डाउनलिंकिंग किंवा दोन्हीसाठी परवानगी दिली आहे. भारतामध्ये डाउनलिंकिंगसाठी उपलब्ध असलेल्या ९०२ सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सपैकी, ३० जून २०२५ पर्यंत ३३३ चॅनेल्स हे पे टीव्ही स्वरूपात आहेत.


या आकडेवारीतून स्पष्ट होते की, भारताची डिजिटल क्रांती वेगाने सुरू आहे आणि अधिकाधिक लोक ऑनलाइन जगात जोडले जात आहेत. यामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही गती मिळत आहे.

Comments
Add Comment

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही

Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून

Delhi Police : दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची(Pakistan) गुप्तचर संस्था

Supreme Court : 'एआय विनाशकारी; मानवी हस्तक्षेप आवश्यक' - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत सावधगिरीचा

Indian Army : व्हेनेझुएलात भारतीय सैन्याची मानवतावादी कामगिरी; मलब्यातून ७९ वर्षीय महिलेला दिले जीवदान

नवी दिल्ली : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारतीय सैन्याने मलब्याखाली अडकलेल्या ७९ वर्षीय

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी पहिला जत्था जम्मूहून रवाना

जम्मू : वार्षिक अमरनाथ यात्रेला गुरुवारी औपचारिकपणे सुरुवात झाली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कडेकोट