जरांगेंच्या आंदोलनामुळे ज्या मालमत्तेचे नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार ?


मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातले आंदोलन संपले. पण या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेच जे नुकसान झाले आहे, त्याचं काय ? असा सवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने उपोषणकर्ते जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांना विचारला आहे. अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले असून, पोलीस कर्मचारी आंदोलकांना आवरताना जखमी झाल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि राज्य सरकारच्यावतीने खंडपीठासमोर करण्यात आला. यासंदर्भात जरांगेंसह आयोजकांना चार आठवड्यात आपली भूमिका प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने दिले.


सुनावणीदरम्यान, मालमत्तेच्या नुकसानीबाबतचा आरोप जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी फेटाळला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानात झालेलं आंदोलन आणि यापूर्वीची सर्व आंदोलने आणि मोर्चे हे शांततापूर्ण झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनादरम्यान कुठेही गालबोट लागेल, असा प्रकार घडलेला नाही. याचिकाकर्त्यांनी जे फोटो दाखवत आहेत, ते या आंदोलनाचे नसून जुन्या आंदोलनातील घटनांचे आहेत, असा दावाही अॅड. मानेशिं यांच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचेही पुरावे याचिकाकर्त्यांनी कोर्टात सादर केले.


उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच या आंदोलनाचा तोडगा कमी वेळेत निघाला, अशी सरकारी पक्ष आणि आयोजकांच्या वकीलांकडून मान्य करण्यात आले. याची ही नोंद खंडपीठाने घेतली, मात्र ही याचिका तातडीने निकाली काढता येणार नाही, असे स्पष्ट केले. कारण याचिकाकर्त्यांनी या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. याची हायकोर्टानं मनोज जरांगे आणि आयोजकांना जाणीव करून दिली. जरांगेंच्यावतीने हे आरोप तातडीने फेटाळण्यात आले. यावर आम्ही आजच कुठलेही आदेश देत नाही, मात्र दोन आठवड्यांत सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने ही सुनावणी चार आठवड्यांकरिता तहकूब केली.


Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा

उद्धव गटाने दसरा मेळावा सोनिया गांधींच्या अंगणात घ्यावा

मुंबई: त्यांचे हाय कमांड दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडे विमान भरण्याइतकेही समर्थक नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला

नाराजीचा स्फोट : अमेरिकेत १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे; आता पुढे काय होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजीचा स्फोट; बेरोजगारीच्या संकटात वाढ होण्याची भीती दुसऱ्या

शेतकरी खचून गेलेत, पण सरकार त्यांच्या पाठीशी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचे आश्वासन मुंबई: मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

कर्करोग उपचारांसाठी सर्वसमावेशक धोरण; जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन आणि सौर कृषीपंपांसाठी अतिरिक्त