जरांगेंच्या आंदोलनामुळे ज्या मालमत्तेचे नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार ?


मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातले आंदोलन संपले. पण या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेच जे नुकसान झाले आहे, त्याचं काय ? असा सवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने उपोषणकर्ते जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांना विचारला आहे. अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले असून, पोलीस कर्मचारी आंदोलकांना आवरताना जखमी झाल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि राज्य सरकारच्यावतीने खंडपीठासमोर करण्यात आला. यासंदर्भात जरांगेंसह आयोजकांना चार आठवड्यात आपली भूमिका प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने दिले.


सुनावणीदरम्यान, मालमत्तेच्या नुकसानीबाबतचा आरोप जरांगेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी फेटाळला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानात झालेलं आंदोलन आणि यापूर्वीची सर्व आंदोलने आणि मोर्चे हे शांततापूर्ण झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनादरम्यान कुठेही गालबोट लागेल, असा प्रकार घडलेला नाही. याचिकाकर्त्यांनी जे फोटो दाखवत आहेत, ते या आंदोलनाचे नसून जुन्या आंदोलनातील घटनांचे आहेत, असा दावाही अॅड. मानेशिं यांच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचेही पुरावे याचिकाकर्त्यांनी कोर्टात सादर केले.


उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच या आंदोलनाचा तोडगा कमी वेळेत निघाला, अशी सरकारी पक्ष आणि आयोजकांच्या वकीलांकडून मान्य करण्यात आले. याची ही नोंद खंडपीठाने घेतली, मात्र ही याचिका तातडीने निकाली काढता येणार नाही, असे स्पष्ट केले. कारण याचिकाकर्त्यांनी या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. याची हायकोर्टानं मनोज जरांगे आणि आयोजकांना जाणीव करून दिली. जरांगेंच्यावतीने हे आरोप तातडीने फेटाळण्यात आले. यावर आम्ही आजच कुठलेही आदेश देत नाही, मात्र दोन आठवड्यांत सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने ही सुनावणी चार आठवड्यांकरिता तहकूब केली.


Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा