मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण


मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे ठाणे आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच मेट्रोच्या माध्यमातून जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो ४ च्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरच्या मार्गापैकी ६.९० किलोमीटरवर गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग आला आहे.


ठाणे-वडाळा-घाटकोपर-कसारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. गर्डरची कामे पूर्ण झाल्याने आता स्थानके उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरपैकी ६.९० किलोमीटरच्या मार्गावरील गार्डरची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.


या कामांमध्ये प्री-कास्ट यु-गार्डरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरेल. मेट्रो ४ च्या मार्गात कापुरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली या महत्वाच्या सहा स्थानकांचा समावेश आहे. या भागांमध्ये काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल.


ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या रस्त्यांवर असलेल्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना दररोज प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.


Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता