आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल: मनोज जरांगे

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, या मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या काही हुल्लडबाजांमुळे मुंबईकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांच्या गाड्यांमुळे सदर ठिकाणी मोठी वाहतूककोंडी झाली. ज्यामुळे उच्च न्यायालयाने आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर, नियमाची पायमल्ली केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांनादेखील आझाद मैदान खाली करण्याची नोटीस दिली. ज्यावर आता जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावून लावणे सरकारला महागात पडेल असा थेट इशाराच त्यांनी आता राज्य सरकारला दिला आहे.

मेलो तरी हटणार नाही: जरांगे पाटील


मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यापासूनच जोरदार टीका करताना दिसले आहेत. त्यांनी आजही त्याची री ओढली आहे.  "सरकारने भीती दाखवली तरीही आम्ही मागे हटणार नाहीत. मी तर मेलो तरीही या आझाद मैदानातून हटत नाही, काय व्हायचे ते होऊ द्या. याचे दुष्परिणाम तुम्ही (देवेंद्र फडणवीस) जाणे आणि मराठे जाणे. मराठे काय असतात ते पुन्हा साडेतीनशे वर्षांनी बघायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे." असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर सरकारला नासकी सवय लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी, पण...


पुढे जरांगे पाटील यांनी म्हटले की, आमची सरकारसोबत चर्चा करायची तयारी आहे. ३० ते ३५ मंत्री या नाही तर दोघे या आमची चर्चा करण्याची तयारी आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांचा आम्ही सन्मान करू. कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायच्या नसतो, असे म्हणत त्यांनी थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.

आरक्षणावर सरकार नवा जीआर काढण्याच्या तयारीत


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या सूचना आणि विविध घटकांच्या मागण्यांमुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसमितीने मराठा आरक्षणाच्या नव्या मसुद्यावर चर्चा केली. या मसुद्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. सध्याच्या पद्धतीत अनेक अडचणी येत असल्याने सरकार या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची